शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसू नक्षत्रातही पाऊस बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : शेतकरी आजही हवामान खात्याच्या तुलनेत पंचांग, नक्षत्र व त्यांच्या वाहनांवर अधिक विश्वास ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : शेतकरी आजही हवामान खात्याच्या तुलनेत पंचांग, नक्षत्र व त्यांच्या वाहनांवर अधिक विश्वास ठेवतात. यंदा पावसाची राेहिणी, मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, पुनर्वसू सुरू आहे. या नक्षत्राला घाेड्याचे वाहन असल्याने त्यात भरपूर पाऊस काेसळणार असल्याचा अंदाजही पंचांगात व्यक्त केला आहे. वास्तवात, या काळात काटाेल विभागात (काटाेल व नरखेड तालुका) सतत ढगाळ वातावरण असूनही पावसाचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

यंदा मृग नक्षत्राला गाढव तर आर्द्राला काेल्ह्याचे वाहन हाेते. त्यामुळे त्या दाेन्ही नक्षत्रांमध्ये कमी पाऊस काेसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मंगळवार (दि. २०)पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले. याला घाेड्याचे वाहन आहे. त्यामुळे या नक्षत्रात कुठे जाेरदार तर कुठे कमी पाऊस काेसळणार असल्याचेही तसेच २० जुलै ते १५ ऑगस्ट या काळात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळणार असल्याचे पंचांग अभ्यासक सांगतात. वास्तवात, मंगळवार (दि. २५)पर्यंत तालुक्यात फारच कमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना अद्याप माेठे पूर आले नसल्याने विहिरींची पाणी पातळी जेमतेम आहे.

नागपूर जिह्यातील काही प्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील जाम प्रकल्पात मात्र १२.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पामुळे काटाेल तालुक्यातील २२ व नरखेड तालुक्यातील २७ गावांमधील ६,५०० हेक्टर शेतीचे ओलित केले जाते. त्यामुळे ही बाब काटाेल, नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबी उत्पादकांसाेबतच काटाेल व काेंढाळीवासीयांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

पुनर्वसूनंतर आश्लेषा, मघा, पूर्वा व उत्तरा ही पाण्याची नक्षत्रे असली तरी हा पिकांच्या वाढीचा काळ नसल्याने तसेच या काळात पिके परिपक्व हाेत असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. या काळात सतत पाऊस काेसळल्यास पिकांची आंतर मशागत करण्यास अडचणी येतात. त्यानंतरची हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्राच्या काळात परतीच्या पावसाची शक्यता असल्याने या काळात कापणीला आलेली पिके खराब हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

....

जाम प्रकल्पात १२.७० टक्के पाणीसाठा

जाम प्रकल्पातून काटाेल व काेंढाळीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे. शिवाय, काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीही दिले जाते. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता २९ दलघमीची असून, यात रविवार (दि. २५)पर्यंत २४.३० दलघमी उपयुक्त पाणीसाठा असायला हवा. मात्र, यात उपयुक्त पाणीसाठा ७.७८५ दलघमी म्हणजेच १२.७० टक्के असल्याची माहिती जाम प्रकल्पाचे अधिकारी रिझवी यांनी दिली. या साठ्यात ४.७०० दलघमी हा मृत साठा आहे. २५ जुलै २०२० राेजी हा प्रकल्प ७० टक्के भरला हाेता, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले.

...

पावसाच्या नाेंदी

जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस काेसळला असला तरी काटाेल तालुका मात्र मागे राहिला. तालुक्यात २५ जुलैपर्यंत केवळ ३५३.७३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. यात तालुक्यातील काटोल महसूल मंडळात ३४६.९ मिमी, कोंढाळी मंडळात ४८१.४ मिमी, मेटपांजरा मंडळात २८९ मिमी, येनवा मंडळात २५४.४ मिमी, पारडसिंगा मंडळात ३४५.४ मिमी व रिधोरा मंडळात ४०५.३ मिमी पावसाचा समावेश आहे.

...