शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पुनर्वसू नक्षत्रातही पाऊस बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : शेतकरी आजही हवामान खात्याच्या तुलनेत पंचांग, नक्षत्र व त्यांच्या वाहनांवर अधिक विश्वास ...

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : शेतकरी आजही हवामान खात्याच्या तुलनेत पंचांग, नक्षत्र व त्यांच्या वाहनांवर अधिक विश्वास ठेवतात. यंदा पावसाची राेहिणी, मृग व आर्द्रा ही महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, पुनर्वसू सुरू आहे. या नक्षत्राला घाेड्याचे वाहन असल्याने त्यात भरपूर पाऊस काेसळणार असल्याचा अंदाजही पंचांगात व्यक्त केला आहे. वास्तवात, या काळात काटाेल विभागात (काटाेल व नरखेड तालुका) सतत ढगाळ वातावरण असूनही पावसाचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

यंदा मृग नक्षत्राला गाढव तर आर्द्राला काेल्ह्याचे वाहन हाेते. त्यामुळे त्या दाेन्ही नक्षत्रांमध्ये कमी पाऊस काेसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मंगळवार (दि. २०)पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले. याला घाेड्याचे वाहन आहे. त्यामुळे या नक्षत्रात कुठे जाेरदार तर कुठे कमी पाऊस काेसळणार असल्याचेही तसेच २० जुलै ते १५ ऑगस्ट या काळात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळणार असल्याचे पंचांग अभ्यासक सांगतात. वास्तवात, मंगळवार (दि. २५)पर्यंत तालुक्यात फारच कमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना अद्याप माेठे पूर आले नसल्याने विहिरींची पाणी पातळी जेमतेम आहे.

नागपूर जिह्यातील काही प्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील जाम प्रकल्पात मात्र १२.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पामुळे काटाेल तालुक्यातील २२ व नरखेड तालुक्यातील २७ गावांमधील ६,५०० हेक्टर शेतीचे ओलित केले जाते. त्यामुळे ही बाब काटाेल, नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबी उत्पादकांसाेबतच काटाेल व काेंढाळीवासीयांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

पुनर्वसूनंतर आश्लेषा, मघा, पूर्वा व उत्तरा ही पाण्याची नक्षत्रे असली तरी हा पिकांच्या वाढीचा काळ नसल्याने तसेच या काळात पिके परिपक्व हाेत असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. या काळात सतत पाऊस काेसळल्यास पिकांची आंतर मशागत करण्यास अडचणी येतात. त्यानंतरची हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्राच्या काळात परतीच्या पावसाची शक्यता असल्याने या काळात कापणीला आलेली पिके खराब हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

....

जाम प्रकल्पात १२.७० टक्के पाणीसाठा

जाम प्रकल्पातून काटाेल व काेंढाळीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे. शिवाय, काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीही दिले जाते. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता २९ दलघमीची असून, यात रविवार (दि. २५)पर्यंत २४.३० दलघमी उपयुक्त पाणीसाठा असायला हवा. मात्र, यात उपयुक्त पाणीसाठा ७.७८५ दलघमी म्हणजेच १२.७० टक्के असल्याची माहिती जाम प्रकल्पाचे अधिकारी रिझवी यांनी दिली. या साठ्यात ४.७०० दलघमी हा मृत साठा आहे. २५ जुलै २०२० राेजी हा प्रकल्प ७० टक्के भरला हाेता, असेही रिझवी यांनी स्पष्ट केले.

...

पावसाच्या नाेंदी

जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस काेसळला असला तरी काटाेल तालुका मात्र मागे राहिला. तालुक्यात २५ जुलैपर्यंत केवळ ३५३.७३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. यात तालुक्यातील काटोल महसूल मंडळात ३४६.९ मिमी, कोंढाळी मंडळात ४८१.४ मिमी, मेटपांजरा मंडळात २८९ मिमी, येनवा मंडळात २५४.४ मिमी, पारडसिंगा मंडळात ३४५.४ मिमी व रिधोरा मंडळात ४०५.३ मिमी पावसाचा समावेश आहे.

...