शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

उपराजधानीत ‘हिवसाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 09:36 IST

उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... !

ठळक मुद्दे रेनकोट घालावा की स्वेटर? थंडी, पावसामुळे गारठले नागपूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... ! एरवी ऊन-पावसाचा खेळ नेहमीच अनुभवणाऱ्या नागपूरकरांनी सोमवारी थंडी व पावसाची गारठविणारी युती अनुभवली. घराबाहेर निघताना ‘रेनकोट’ घालावा की ‘स्वेटर’, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. घसरलेला पारा, पाऊस आणि बोचरा वारा यामुळे शहरात ‘हिवसाळा’ हा नवाच ऋतू दिसून आला.

‘हिल स्टेशन’चा अनुभवसाधारणत: डिसेंबर महिन्यात उपराजधानीत पाऊस पडत नाही. मात्र सोमवारी पावसामुळे ‘हिल स्टेशन’चा अनुभव येत होता. विशेषत: फुटाळा तलाव परिसर, सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्ससारख्या भागांमध्ये तर वातावरणत तसेच झाले होते. सायंकाळनंतरच शहरातील विविध भागात शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, शिवाय वारेदेखील वाहत होते. त्यामुळे हुडहुडी भरल्याचे जाणवून आले. दुपारी १च्या सुमारास शहरातील काही भागात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळीदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. वारे, पाऊस यांच्यामुळे दिवसभरात पारा खालावला. मात्र रात्री किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले तर कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र व फेथई चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरणात बदल झाला आहे. डिसेंबर असूनदेखील पारा हवा तसा खालावला नव्हता. मात्र वातावरणातील बदलाने गारठा भरला. या चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास आर्द्रतेची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहू शकते, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.रायपूरची पाच विमाने नागपूरकडे ‘डायव्हर्टसोमवारी छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन केल्यामुळे भूपेश बघेल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार होते. पण हा सोहळा खराब हवामानामुळे काहीसा गोत्यात आल्यासारखा दिसला. कारण सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध शहरातून रायपूरकडे जाणारी पाच विमाने लॅण्ड झाली. रायपूरमध्ये पसरलेल्या धुक्यांमुळे व्हिजिबिलिटी (दृश्यता) कमी झाल्यामुळे या विमानांना नागपूरकडे डायव्हर्ट करण्यात आले होते. सर्वच विमाने सोमवारी सकाळी ८.३० ते १० च्या दरम्यान विमानतळावर उतरली. यात इंडिगो एअरलाईन्सचे दिल्ली-रायपूर ६ ई २७५७ हे विमान ८.३० वाजता लॅण्ड झाले. हैदराबाद-रायपूर ६ ई ३८४ हे विमान ९ वाजता उतरले. जेट एअरवेजचे दिल्ली -रायपूर हे विमान ९ डब्ल्यू ७४६ सकाळी ८.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले. त्याचबरोबर जेटलाईटचे मुंबई-रायपूर एस २-३७७ हे तीन तास उशिरा उडल्यानंतरही सकाळी ९ वाजता नागपुरात उतरले. एअर इंडियाचे दिल्ली-रायपूर एआय ४६९ हे विमान सुद्धा नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे की, काही विमाने दिल्ली विमानतळावरूनच उडण्यास उशीर झाला. विशेष म्हणजे छत्तीसगडला भूपेश बघेल यांचा सोमवारी शपथविधी समारंभ होता. या समारंभासाठी दिल्ली येथून कॉँग्रेसचे दिग्गज नेतेगण पोहचणार असल्याचा अंदाज होता. पण नागपूर विमानतळावर डायव्हर्ट होऊन उतरलेल्या विमानातून कुणीही प्रवासी उतरले नाही. ही विमाने अर्धा तास थांबून राहिली. सकाळी १० नंतर काही मिनिटांच्या अंतरामध्ये नागपुरातून रायपूरकडे रवाना झाली.

१००० पेक्षा कमी होती व्हिजिबिलिटीविमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रानुसार सोमवारी सकाळी रायपूर विमानतळावरील हवामान खराब असल्याने व्हिजिबिलिटी १००० मीटरपेक्षा कमी झाली होती. त्यामुळे रायपूर विमानतळावर विमानांना उतरण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विमानातील वैमानिकांनी जवळच्या नागपूर विमानतळावर लॅण्डींग करण्यास परवानगी मागितली होती.

११ रेल्वेगाड्याही लेटसोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर ताटकळत बसून राहण्याची पाळी आली. यामुळे वेटिंग रुम फुल्ल झाल्याचे दिसले. टाटानगरजवळ रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम सुरू असल्यामुळे आणि धुक्यामुळे नागपुरातून जाणाºया ११ रेल्वेगाड्या सोमवारी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दरम्यान उशिराने येणाºया रेल्वेगाड्यात हावडा-पुणे आझादहिंद, रक्सोल-हैदराबाद, हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, कटरा-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना, टाटानगर-लोकमान्य टिळक टर्मिनस लेट होती.

 

 

 

टॅग्स :Rainपाऊस