शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

रेल्वेत घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव 

By नरेश डोंगरे | Updated: November 25, 2024 21:12 IST

दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती; एससी, एसटी कर्मचारी अधिवेशनात वक्तव्य

नागपूर : रेल्वेत घातपाताचे, हल्ला चढविण्याचे कारस्थान कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. नागपुरातील अजनी रेल्वे ग्राउंडवर सोमवारी आयोजित अखिल भारतीय अनुसूचित जाती-जमाती रेल्वे कर्मचारी संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एल. भैरव, महासचिव अशोक कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापक नीनू इटेरिया, व्यवस्थापक मनीष अग्रवाल, व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.ते म्हणाले, भारतीय रेल्वेच्या विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्यासोबतच धोकाही वाढला आहे. ट्रॅकवर गॅस सिलिंडर किंवा तसेच काहीसे साहित्य ठेवून घातपात घडविण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र, घातपाताचा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी सतर्कतेने कर्तव्य बजावण्याची गरज आहे, असे यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरतीभारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने वार्षिक भरती कॅलेंडरची सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील भरती प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. पुढे बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत करण्यात आलेल्या ४.४ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.संविधानाचा सन्मान कर्तृत्वातून झळकायला हवाअधिवेशनाला संबोधित करण्यासाठी नागपुरात आलेले वैष्णव विमानतळावरून दीक्षाभूमीला पोहोचले. येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला त्यांनी नमन केले. दरम्यान, संविधान दिनाच्या पूर्व संध्येला अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, संविधानाचा सन्मान केवळ प्रतीक म्हणून मर्यादित असू नये. संविधान वारंवार हातात झळकविण्यापेक्षा त्याचे प्रतिबिंब कर्तृत्वातून झळकायला हवे. मोदी सरकारचा संविधानाबाबतचा आदर अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत प्रवेश करताना संविधानासमोर नतमस्तक झाले होते, याचीही आठवण रेल्वे मंत्र्यांनी करून दिली.मोठ्या प्रमाणावर जनरल कोचची निर्मितीरेल्वेकडून १२ हजार जनरल कोचची निर्मिती केली जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा प्रवास अधिक सहजसोपा होईल, असे सांगतानाच रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेतील सोयी, सुविधा आणि सुधारणांचाही उल्लेख केला. वैष्णव यांच्या हस्ते यावेळी कर्मचारी संघाच्या एका स्मरणिकेचेही विमोचन करण्यात आले. या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप मंगळवारी संविधानदिनी होणार आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरी