शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव 

By नरेश डोंगरे | Updated: November 25, 2024 21:12 IST

दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती; एससी, एसटी कर्मचारी अधिवेशनात वक्तव्य

नागपूर : रेल्वेत घातपाताचे, हल्ला चढविण्याचे कारस्थान कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. नागपुरातील अजनी रेल्वे ग्राउंडवर सोमवारी आयोजित अखिल भारतीय अनुसूचित जाती-जमाती रेल्वे कर्मचारी संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एल. भैरव, महासचिव अशोक कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापक नीनू इटेरिया, व्यवस्थापक मनीष अग्रवाल, व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.ते म्हणाले, भारतीय रेल्वेच्या विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्यासोबतच धोकाही वाढला आहे. ट्रॅकवर गॅस सिलिंडर किंवा तसेच काहीसे साहित्य ठेवून घातपात घडविण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र, घातपाताचा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी सतर्कतेने कर्तव्य बजावण्याची गरज आहे, असे यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरतीभारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने वार्षिक भरती कॅलेंडरची सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील भरती प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. पुढे बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांत रेल्वेत पाच लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत करण्यात आलेल्या ४.४ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.संविधानाचा सन्मान कर्तृत्वातून झळकायला हवाअधिवेशनाला संबोधित करण्यासाठी नागपुरात आलेले वैष्णव विमानतळावरून दीक्षाभूमीला पोहोचले. येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला त्यांनी नमन केले. दरम्यान, संविधान दिनाच्या पूर्व संध्येला अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, संविधानाचा सन्मान केवळ प्रतीक म्हणून मर्यादित असू नये. संविधान वारंवार हातात झळकविण्यापेक्षा त्याचे प्रतिबिंब कर्तृत्वातून झळकायला हवे. मोदी सरकारचा संविधानाबाबतचा आदर अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत प्रवेश करताना संविधानासमोर नतमस्तक झाले होते, याचीही आठवण रेल्वे मंत्र्यांनी करून दिली.मोठ्या प्रमाणावर जनरल कोचची निर्मितीरेल्वेकडून १२ हजार जनरल कोचची निर्मिती केली जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा प्रवास अधिक सहजसोपा होईल, असे सांगतानाच रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेतील सोयी, सुविधा आणि सुधारणांचाही उल्लेख केला. वैष्णव यांच्या हस्ते यावेळी कर्मचारी संघाच्या एका स्मरणिकेचेही विमोचन करण्यात आले. या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप मंगळवारी संविधानदिनी होणार आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरी