शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या हाती मुद्दल अन् रेल्वे खातेय व्याज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 11:00 IST

प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकीट काढून कन्फर्म तिकीट मिळवितात. परंतु संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे कन्फर्म तिकीट जवळ असूनही प्रवाशांना मनस्ताप होतो.

ठळक मुद्देरेल्वेचा अजब न्याय हजारो प्रवाशांना फटका, ऐनवेळी रद्द करतात गाड्या

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासाची तारीख ठरली तेव्हा बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकिटांचे आरक्षण करतात. प्रवासाच्या दिवशी ऐनवेळी काहीतरी कारण सांगून प्रवाशांना संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. रेल्वे केवळ तिकिटाची रक्कम प्रवाशांना सोपवून त्यांची बोळवण करते. अशा वेळी प्रवाशांना झालेल्या मनस्तापाऐवजी त्यांना अधिक रक्कम द्यावयाची सोडून रेल्वे केवळ मुद्दल देऊन व्याज मात्र आपण खाण्याचा प्रकार करते. त्यामुळे ऐनवेळी गाडी रद्द केल्यामुळे मनस्ताप झालेल्या प्रवाशांना रेल्वेने व्याजासह पैसे परत करण्याची गरज आहे.प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकीट काढून कन्फर्म तिकीट मिळवितात. परंतु प्रवासाला निघताना ऐनवेळी प्रवाशांना संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे कन्फर्म तिकीट जवळ असूनही प्रवाशांना मनस्ताप होतो. चार महिन्यापूर्वी प्रवासी तिकिटांचे पैसे भरतात.ही रक्कम थेट रेल्वेच्या खात्यात जमा होते. चार महिन्यापासून त्यावर मिळणारे व्याजही रेल्वेच्याच खात्यात जमा होते. परंतु ऐनवेळी गाडी रद्द करून प्रवाशांना तिकिटाची १०० टक्के रक्कम कोणतीही कपात न करता परत करण्यात येत असल्याचे सांगून रेल्वे प्रशासन उपकार केल्यासारखा आव आणते.परंतु खरा प्रश्न निर्माण होतो तो चार महिन्यातील संबंधित रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचा. चार महिन्यापूर्वी पैसे भरल्यामुळे रेल्वेला प्रवाशांच्या पैशांवर व्याज मिळते. त्यामुळे गाडी रद्द केल्यानंतर प्रवाशांना चार महिन्यांच्या व्याजासह रक्कम परत मिळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन मात्र तिकिटांची रक्कम परत करीत आपले हात झटकून घेते. ऐनवेळी रेल्वेगाडी रद्द केल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास होतो. ऐनवेळी रेल्वेगाडी रद्द केल्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवाशांना अधिक पैसे मोजून विमानाने जाण्याची पाळी येते. परंतु केवळ मुद्दल परत करून रेल्वे प्रशासन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करते.त्यामुळे रद्द केलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांनी तिकीट काढलेल्या तारखेपासूनचे व्याज देण्याची गरज आहे.

‘लेट’ गाड्यातील प्रवाशांनाही तोच नियमअनेकदा रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. कधी दोन तास तर कधी आठ तास गाड्यांना विलंब होतो. प्रवाशांनी वेळेनुसार गाड्यांचे आरक्षण केलेले असते. एका गाडीतून प्रवास केल्यानंतर त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर दुसºया रेल्वेगाडीने प्रवास करावयाचा असतो. परंतु अनेकदा रेल्वेगाडीच उशिराने आल्यामुळे त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर आरक्षण केलेली गाडी मिळत नाही. अशा वेळीही तिकीट रद्द करणाºया प्रवाशांना केवळ तिकिटाची रक्कम हातात देण्यात येते. रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांना व्याजासह पैसे परत करण्याची मागणी होत आहे.

व्याजासह पैसे परत करावेत‘रेल्वेकडून काही तांत्रिक कारणामुळे किंवा अन्य कारणांनी रेल्वेगाडी रद्द झाली असेल तर प्रवाशांना मनस्ताप होतो. त्यामुळे प्रवाशांना केवळ तिकिटाची १०० टक्के रक्कम परत न करता रेल्वेने त्यांना चार महिन्यांच्या व्याजासह रक्कम परत करावी.’-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र

व्याजासह पैसे देण्याचा निर्णय धोरणात्मक‘ऐनवेळी गाडी रद्द केली असल्यास किंवा गाडी तीन तासापेक्षा अधिक लेट असल्यास तिकिटांच्या रकमेसोबत व्याज देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याबाबत विभागीय पातळीवर काहीच निर्णय घेता येऊ शकत नाही.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे,नागपूर विभाग

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे