शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट दरवाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:49 IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

ठळक मुद्देअधिक पैसे मोजावे लागणार : तिकीट १ ते ४ पैशांनी महागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.रेल्वेने २०१४-१५ नंतर पहिल्यांदाच प्रवासभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये नॉन एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर २ पैसे, एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर ४ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. १ जानेवारी आणि त्यानंतर तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना नव्या दरानुसार तिकीट खरेदी करावे लागणार आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येणार नाही. मागील चार वर्षात रेल्वेने पहिल्यांदाच तिकीट दरात वाढ केली आहे. रेल्वेने देशभरात रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोफत वाय फाय, एस्केलेटर, एसी वेटिंग रुम, पॅसेंजर लाऊंज, आधुनिक एलएचबी कोच या सुविधांचा समावेश आहे. सातव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू केल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे प्रवासभाड्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. ते काही असो परंतु नव्या वर्षात मात्र प्रवाशांना या वाढलेल्या प्रवासभाड्याचा भार सोसावा लागणार आहे, हे निश्चित.आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांना नाही भुर्दंडरेल्वेने १ जानेवारीपासून प्रवाशांना प्रवासभाड्यात वाढ केलेली आहे. त्यामुळे आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांमध्ये रेल्वेकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची भीती वाटत आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी करणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल करण्यात येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधी तिकीट करणाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.तिकीट दरवाढ चुकीचीनव्या वर्षात शासनाने प्रवाशांना शुभेच्छा द्यावयास हव्या. परंतु प्रवाशांवर तिकीट दरवाढीमुळे अतिरिक्त बोजा पडणार आहे. रेल्वे बजेट पुढील महिन्यात आहे. तेव्हा प्रवासभाडे वाढवायचे सोडून मध्यंतरीच प्रवासभाडे वाढविणे चुकीचे आहे. प्रवाशांना रेल्वेकडून सुविधा मिळत नाहीत. सुविधा देण्याचे सोडून त्यांच्यावर तिकीट दरवाढ लादण्याची गरज नव्हती.’राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटInflationमहागाई