शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

तिकीट दरवाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:49 IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

ठळक मुद्देअधिक पैसे मोजावे लागणार : तिकीट १ ते ४ पैशांनी महागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.रेल्वेने २०१४-१५ नंतर पहिल्यांदाच प्रवासभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये नॉन एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर २ पैसे, एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर ४ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. १ जानेवारी आणि त्यानंतर तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना नव्या दरानुसार तिकीट खरेदी करावे लागणार आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येणार नाही. मागील चार वर्षात रेल्वेने पहिल्यांदाच तिकीट दरात वाढ केली आहे. रेल्वेने देशभरात रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोफत वाय फाय, एस्केलेटर, एसी वेटिंग रुम, पॅसेंजर लाऊंज, आधुनिक एलएचबी कोच या सुविधांचा समावेश आहे. सातव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू केल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे प्रवासभाड्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. ते काही असो परंतु नव्या वर्षात मात्र प्रवाशांना या वाढलेल्या प्रवासभाड्याचा भार सोसावा लागणार आहे, हे निश्चित.आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांना नाही भुर्दंडरेल्वेने १ जानेवारीपासून प्रवाशांना प्रवासभाड्यात वाढ केलेली आहे. त्यामुळे आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांमध्ये रेल्वेकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची भीती वाटत आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी करणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल करण्यात येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधी तिकीट करणाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.तिकीट दरवाढ चुकीचीनव्या वर्षात शासनाने प्रवाशांना शुभेच्छा द्यावयास हव्या. परंतु प्रवाशांवर तिकीट दरवाढीमुळे अतिरिक्त बोजा पडणार आहे. रेल्वे बजेट पुढील महिन्यात आहे. तेव्हा प्रवासभाडे वाढवायचे सोडून मध्यंतरीच प्रवासभाडे वाढविणे चुकीचे आहे. प्रवाशांना रेल्वेकडून सुविधा मिळत नाहीत. सुविधा देण्याचे सोडून त्यांच्यावर तिकीट दरवाढ लादण्याची गरज नव्हती.’राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटInflationमहागाई