शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

नागपूरची औद्योगिक वसाहत बुटीबोरीत ‘रेल नीर’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:38 AM

आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील दुसरा प्रकल्पप्रवाशांना मिळणार बाटलीबंद पाणी

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत प्रवास करताना अनेक प्रवासी पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे अवैध व्हेंडरकडून रिकाम्या बाटल्यात दूषित पाणी भरून त्याची विक्री होते. परंतु आता नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे. आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल नीर बॉटलिंग प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा आयआरसीटीसीचे अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. अखेर बुटीबोरी येथे हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. घोषणा झाल्यानंतर चार वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. बुटीबोरी येथे १० हजार चौरसफुटांवर रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई येथे आयआरसीटीसीने रेल नीरचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून मोजक्याच रेल्वेस्थानकांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागपुरात रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला. बुटीबोरीच्या रेल नीर प्रकल्पात दररोज ७२ हजार लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होणार आहे. नागपुरातून दिवसाकाठी १२० ते १३५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यात प्रवाशांची संख्या ३५ ते ४० हजार आहे. रेल नीर प्रकल्पामुळे आता या प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरसह सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल, घोडाडोंगरी, आमला या रेल्वेस्थानकांना या रेल नीर प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जर्मनीवरून मागविल्या मशीनबुटीबोरी येथील रेल नीर प्लँटसाठी जर्मनीवरून मशीन बोलाविण्यात आल्या आहे. अत्याधुनिक या मशीनद्वारे पाणी स्वच्छ करून ते बाटलीबंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यातील प्रवाशांना आता शुद्ध पिण्याचे पाणी प्रवासात उपलब्ध होणार आहे.औपचारिकता पूर्ण होताच प्रकल्प सुरू‘बुटीबोरी येथील आयआरसीटीसीचा रेल नीर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. औपचारिकता पूर्ण होताच उन्हाळ्यापूर्वी आगामी तीन ते चार महिन्यात या प्रकल्पात शुद्ध पाण्याची निर्मिती सुरु होईल.’-पिनाकीन मोरावाल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर