शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूरची औद्योगिक वसाहत बुटीबोरीत ‘रेल नीर’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:40 IST

आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील दुसरा प्रकल्पप्रवाशांना मिळणार बाटलीबंद पाणी

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत प्रवास करताना अनेक प्रवासी पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे अवैध व्हेंडरकडून रिकाम्या बाटल्यात दूषित पाणी भरून त्याची विक्री होते. परंतु आता नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे. आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल नीर बॉटलिंग प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा आयआरसीटीसीचे अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. अखेर बुटीबोरी येथे हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. घोषणा झाल्यानंतर चार वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. बुटीबोरी येथे १० हजार चौरसफुटांवर रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई येथे आयआरसीटीसीने रेल नीरचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून मोजक्याच रेल्वेस्थानकांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागपुरात रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला. बुटीबोरीच्या रेल नीर प्रकल्पात दररोज ७२ हजार लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होणार आहे. नागपुरातून दिवसाकाठी १२० ते १३५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यात प्रवाशांची संख्या ३५ ते ४० हजार आहे. रेल नीर प्रकल्पामुळे आता या प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरसह सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल, घोडाडोंगरी, आमला या रेल्वेस्थानकांना या रेल नीर प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जर्मनीवरून मागविल्या मशीनबुटीबोरी येथील रेल नीर प्लँटसाठी जर्मनीवरून मशीन बोलाविण्यात आल्या आहे. अत्याधुनिक या मशीनद्वारे पाणी स्वच्छ करून ते बाटलीबंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यातील प्रवाशांना आता शुद्ध पिण्याचे पाणी प्रवासात उपलब्ध होणार आहे.औपचारिकता पूर्ण होताच प्रकल्प सुरू‘बुटीबोरी येथील आयआरसीटीसीचा रेल नीर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. औपचारिकता पूर्ण होताच उन्हाळ्यापूर्वी आगामी तीन ते चार महिन्यात या प्रकल्पात शुद्ध पाण्याची निर्मिती सुरु होईल.’-पिनाकीन मोरावाल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर