शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नागपूरची औद्योगिक वसाहत बुटीबोरीत ‘रेल नीर’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:40 IST

आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील दुसरा प्रकल्पप्रवाशांना मिळणार बाटलीबंद पाणी

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत प्रवास करताना अनेक प्रवासी पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे अवैध व्हेंडरकडून रिकाम्या बाटल्यात दूषित पाणी भरून त्याची विक्री होते. परंतु आता नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे. आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल नीर बॉटलिंग प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा आयआरसीटीसीचे अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. अखेर बुटीबोरी येथे हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. घोषणा झाल्यानंतर चार वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. बुटीबोरी येथे १० हजार चौरसफुटांवर रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई येथे आयआरसीटीसीने रेल नीरचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून मोजक्याच रेल्वेस्थानकांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागपुरात रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला. बुटीबोरीच्या रेल नीर प्रकल्पात दररोज ७२ हजार लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होणार आहे. नागपुरातून दिवसाकाठी १२० ते १३५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यात प्रवाशांची संख्या ३५ ते ४० हजार आहे. रेल नीर प्रकल्पामुळे आता या प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरसह सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल, घोडाडोंगरी, आमला या रेल्वेस्थानकांना या रेल नीर प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जर्मनीवरून मागविल्या मशीनबुटीबोरी येथील रेल नीर प्लँटसाठी जर्मनीवरून मशीन बोलाविण्यात आल्या आहे. अत्याधुनिक या मशीनद्वारे पाणी स्वच्छ करून ते बाटलीबंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यातील प्रवाशांना आता शुद्ध पिण्याचे पाणी प्रवासात उपलब्ध होणार आहे.औपचारिकता पूर्ण होताच प्रकल्प सुरू‘बुटीबोरी येथील आयआरसीटीसीचा रेल नीर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. औपचारिकता पूर्ण होताच उन्हाळ्यापूर्वी आगामी तीन ते चार महिन्यात या प्रकल्पात शुद्ध पाण्याची निर्मिती सुरु होईल.’-पिनाकीन मोरावाल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर