शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सडक्या सुपारीवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यावर धाड; लाखोंचा माल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 21:29 IST

Nagpur News सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून आरोग्यास अपायकारक असलेली ही सुपारी बाजारात विकायला पाठवली जात असल्याची तक्रार मिळाल्यामुळे शनिवारी दुपारी नागपूर पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने यशोधरानगरातील एका सुपारी कारखान्याावर छापा मारला. सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून आरोग्यास अपायकारक असलेली ही सुपारी बाजारात विकायला पाठवली जात असल्याची तक्रार मिळाल्यामुळे शनिवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली.

नागपूर हे सडक्या सुपारीच्या तस्करीचे मुख्य केंद्र आहे. इंडोेनेशिया, मॅनमारसह ठिकठिकाणच्या सुपारी तस्करांशी नागपुरातील सुपारी तस्करांचे संबंध आहेत. आरोग्यास अपायकारक असलेली सडलेली सुपारी त्या देशात घाणीच्या ढिगाऱ्यातून उचलून हे तस्कर आणतात. लकडगंज, शांतीनगर, यशोधरानगर, ईतवारी, कापसी कळमनासह विविध भागात असलेल्या भट्टीत या सडलेल्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती टणक आणि शुभ्र बनवून विकली जाते. या सडक्या सुपारीचा नंतर सुगंधित सुपारी, पानमसाला, गुटखा आणि खर्ऱ्यात वापर केला जातो. या सुपारीची नागपूरहून महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह विविध राज्यात तस्करी केली जाते.

एफडीएतील काही भ्रष्ट मंडळी तसेच काही ठिकाणच्या पोलिसांना लाखोंचा हप्ता मिळत असल्याने ते या तस्करीकडे लक्ष देत नाही. यशोधरानगरात अशा सडक्या सुपारीवर प्रक्रिया करून ती टणक बनवली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या परिमंडळ तीनच्या युनिटला शनिवारी दुपारी मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने यशोधरानगरातील एका गृह उद्योगावर छापा घातला. मोहम्मद असलम शेख इमाम नामक व्यक्तीचा हा कारखाना असल्याचे पोलिसांना कळले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसारच येथे सर्व चित्र होते. मोठ्या प्रमाणावर सुपारीची कटिंगही सुरू होती. ते पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए)च्या अधिकाऱ्यांना तेथे बोलवून घेतले. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या सुपारीचे नमूने ताब्यात घेऊन लाखोंचा साठा सिलबंद केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवण्यात येईल, असे कारवाई करणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे.

छोट्यांवर कारवाई, मोठ्यांना सुरक्षेची हमी

लोकमतने यापूर्वी शहरातील गुटखा तसेच सुपारी तस्करांच्या गोरखधंद्याची वेळोवेळी पोलखोल केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनीही अनेकदा छापेमारीसुद्धा केली आहे. मात्र, कारवाई छोट्या छोट्या तस्करांवरच होते. सुपारीच्या तस्करीतून लाखो नागरिकांच्या जिविताशी खेळणाऱ्या तसेच या गोरखधंद्यातील ‘बडे खेळाडू’ म्हणून कुख्यात असलेले कॅप्टन, माैर्या, बंटी, हारून, आनंद, पाटना, ईर्शाद, आसिफ कलीवाला, गनी, चारमिनार, मुनियार यांच्या अड्ड्यावर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे काही पोलीस आणि एफडीएचे काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी महिन्याला लाखोंची देण घेऊन त्यांना सुरक्षेची हमी देत असल्याचा आरोपाला बळ मिळत आहे.

---

टॅग्स :raidधाड