शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राहुल गांधी यांचे आभारच मानायला हवे; सावरकर गौरव यात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 22:12 IST

Nagpur News ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला.

नागपूरः  राहुलसारख्या लोकांनी कितीही अपमान केला तरी सावरकरांची महानता कमी होत नाही. मात्र राहुल गांधी यांच्यामुळे सावरकरांचे चारित्र्य घरांघरात व नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांचे आभारच मानायला हवे. त्यांनी असेच काम करायला हवे. ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला. नागपुरात सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. भाजप अजिबात जातीयवादी नाही व आम्हाला भेदाभेददेखील मान्य नाही. कॉंंग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षतेच्या मोठमोठ्या बाता करतात, मग जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राहुल गांधी यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण बोलवून मंत्राग्नी का दिला, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.

शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित समारोप कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, राजे मुधोजी भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली, आजच्या गांधींना कधी कळणार ?यावेळी सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर इतिहासातील दाखले देत टीका केली. महात्मा गांधी यांनी हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रात सच्चा, प्रखर व साहसी देशभक्त अशा शब्दांत सावरकरांचे कौतुक केले होते. सावरकरांना इंग्रजांचे मनसुबे माझ्याअगोदर व जास्त प्रमाणात कळाले असेदेखील ते म्हणाले होते. महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली होती, मात्र आजच्या गांधींना कधी कळणार, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला काळ्यापाण्याची शिक्षा, फाशी झाली नाही किंवा लाला लाजपतराय वगळता एकही नेता गोळीबार किंवा लाठीमारात शहीद झाला नाही. कॉंग्रेसचे नेते दिवसा आंदोलन करायचे व रात्री इंग्रजांसोबत जेवायचे. मात्र स्वातंत्र्याचे श्रेय मात्र तेच घेऊन गेले. मुळात ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यात असंतोष पसरला होता व ही बाब आपल्याला महागात पडेल याच विचारातून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असा दावा त्रिवेदी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर