शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

राहुल गांधी यांचे आभारच मानायला हवे; सावरकर गौरव यात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 22:12 IST

Nagpur News ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला.

नागपूरः  राहुलसारख्या लोकांनी कितीही अपमान केला तरी सावरकरांची महानता कमी होत नाही. मात्र राहुल गांधी यांच्यामुळे सावरकरांचे चारित्र्य घरांघरात व नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांचे आभारच मानायला हवे. त्यांनी असेच काम करायला हवे. ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला. नागपुरात सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. भाजप अजिबात जातीयवादी नाही व आम्हाला भेदाभेददेखील मान्य नाही. कॉंंग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षतेच्या मोठमोठ्या बाता करतात, मग जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राहुल गांधी यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण बोलवून मंत्राग्नी का दिला, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.

शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित समारोप कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, राजे मुधोजी भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली, आजच्या गांधींना कधी कळणार ?यावेळी सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर इतिहासातील दाखले देत टीका केली. महात्मा गांधी यांनी हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रात सच्चा, प्रखर व साहसी देशभक्त अशा शब्दांत सावरकरांचे कौतुक केले होते. सावरकरांना इंग्रजांचे मनसुबे माझ्याअगोदर व जास्त प्रमाणात कळाले असेदेखील ते म्हणाले होते. महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली होती, मात्र आजच्या गांधींना कधी कळणार, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला काळ्यापाण्याची शिक्षा, फाशी झाली नाही किंवा लाला लाजपतराय वगळता एकही नेता गोळीबार किंवा लाठीमारात शहीद झाला नाही. कॉंग्रेसचे नेते दिवसा आंदोलन करायचे व रात्री इंग्रजांसोबत जेवायचे. मात्र स्वातंत्र्याचे श्रेय मात्र तेच घेऊन गेले. मुळात ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यात असंतोष पसरला होता व ही बाब आपल्याला महागात पडेल याच विचारातून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असा दावा त्रिवेदी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर