शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

संघभूमीत राहुल गांधी आखणार रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:39 IST

भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी ...

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे ३० एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात ‘किसान पदयात्रा’ काढत आहेत. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्लीहून विमानाने त्यांचे नागपुरात आगमन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात राज्य व विदर्भातील निवडक नेत्यांशी रविभवनात रात्री चर्चा करून ते रणनीती आखणार आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विदर्भानेच बळ दिले होते. आता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी तीच ऊर्जा मिळविण्यासाठी विदर्भात येत असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी सुराबर्डी येथे विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी जिल्हानिहाय चर्चा केली होती. ही भेट पदाधिकाऱ्यांपुरती मर्यादित होती. आता ते थेट शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. नागपूर मुक्कामी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ३० एप्रिल रोजी ते पहाटेच अमरावती जिल्ह्यातील गुंजी या गावासाठी रवाना होतील. त्यामुळे कमी वेळात राहुल गांधी यांच्यापुढे विदर्भातील चित्र मांडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे दुपारी १२ वाजता नागपुरात दाखल होत आहेत. दोन्ही नेते विदर्भातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन ‘किसान पदयात्रा’ यशस्वी करण्यासाठी सूचना देतील. रविभवनात विदर्भातील प्रमुख व निवडक नेत्यांनाच प्रवेश दिला जाणार असून संबंधित नेत्यांशी राहुल गांधी हे चर्चा करतील. (प्रतिनिधी)