शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी विशेष; शांतिनिकेतन शैलीत होणार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:43 IST

बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते.

ठळक मुद्देबाईशे श्राबोण मराठी महिलेच्या इच्छेला बंगाली बांधवांनी दिली साथ

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते. निसर्गाशी गुरुदेवांचे असलेले भावनिक आणि शास्त्रीय अनुबंधाची स्मृती म्हणून शांतिनिकेतनमध्ये या दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या शैलीत वृक्षारोपण केले जाते. अगदी त्याच शैलीत प्रथमच नागपुरात वृक्षारोपणाचा सोहळा म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.कथा, कादंबरी, कविता, नाटक, संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्प अशा नानाविध साहित्य-कलेचे आयाम घेऊन जगताला भुरळ घालणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथमच बंगालमधील शांतिनिकेतन आणि महाराष्ट्रातील नागपूरचे धागे आणखी घट्ट बांधले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी नागपुरात राहणाºया बंगाली नव्हे तर एका मराठी महिलेची प्रगाढ इच्छा कारणीभूत ठरली आणि बंगाली बांधवांनी, ती इच्छा उचलून धरत हा सोहळा आयोजित करण्याचा प्रण घेतला. त्या अनुषंगाने नागपूरकरांना वृक्षारोपणाचा हा अद्भूत सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. रवींद्र संगीताच्या सुरेल स्वरांच्या प्रख्यात गायिका अरुंधती वझलवार-देशमुख यांच्या इच्छेला बंगाली बांधवांनी साथ दिली आहे. इंग्रजी तारखेनुसार ७ ऑगस्ट ही गुरुदेवांची पुण्यतिथी असते. मात्र, बंगाली तिथीनुसार श्रावणातला २२ वा दिवस हा पुण्यतिथीचा दिवस असतो. या तिथीला शांतिनिकेतनतर्फे ‘बाईशे श्राबोण’ असे नामकरण करण्यात आले. यंदा ही तिथी ८ ऑगस्टला येत आहे. त्या अनुषंगाने रविवारचा दिवस बघता बंगाली समाजातर्फे ११ ऑगस्टला दुपारी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

इच्छेला मूर्तरूप येतेय, हीच गुरुदेवांना श्रद्धांजली - अरुंधती देशमुखमाझे वडील प्रा. विद्यासागर वझलवार हे शांतिनिकेतनमध्ये संगीताचे प्राध्यापक असल्याने, मी बालपणापासून ते वयाच्या २३ व्या वर्षीपर्यंत तेथेच होते आणि रवींद्र संगीताचे धडे गिरवीत होते. वैवाहिक कारणाने नागपुरात आल्यानंतर संसारात रमले. काही वर्षांनंतर त्यांनी गुरुदेवांच्या जयंतीला रवींद्र गायनाचे कार्यक्रम सुरू केले. मात्र, शांतिनिकेतनमध्ये ज्याप्रकारे पुण्यतिथी साजरी केली जाते, तशीच नागपुरात आयोजित करण्याची इच्छा होती, असे अरुंधती देशमुख यांनी सांगितले.

पंचमहाभूतांच्या साक्षीने होणार वृक्षारोपण१९२८ मध्ये श्रावणातल्या पहिल्या दिवशी वृक्षारोपणाचा सोहळा साजरा करण्यास टागोर यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये श्रावणातल्या २२ व्या दिवशी अर्थात ७ ऑगस्ट रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पुढच्या वर्षापासून शांतिनिकेतनने गुरुदेवांच्या स्मृतीला अनुसरून श्रावणातल्या पहिल्या दिवसाचा वृक्षारोपणाचा सोहळा २२ व्या दिवशी अर्थात ‘बाईशे श्रावण’ला करण्याचा निर्धार केला. साधारणत: ही तिथी दरवर्षी मागे-पुढे ७, ८ किंवा ९ ऑगस्ट रोजी येत असते. विशेष म्हणजे, वृक्षारोपणाचा हा सोहळा पंचमहाभूतांच्या प्रतिकात्मक रूपांच्या साक्षीने साजरा केला जातो. रवींद्र संगीताची धून, गायन अन् नृत्याच्या तालात ‘बालतरु (रोपटे)’ घेऊन पालखी काढली जाते. अन् पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाशाच्या रूपात सजवलेल्या पाच मुलांच्या साक्षीने वृक्षारोपणाचा सोहळा पार पडतो. अगदी असाच सोहळा नागपुरात साजरा होणार आहे.

टॅग्स :Ravindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर