शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी विशेष; शांतिनिकेतन शैलीत होणार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:43 IST

बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते.

ठळक मुद्देबाईशे श्राबोण मराठी महिलेच्या इच्छेला बंगाली बांधवांनी दिली साथ

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते. निसर्गाशी गुरुदेवांचे असलेले भावनिक आणि शास्त्रीय अनुबंधाची स्मृती म्हणून शांतिनिकेतनमध्ये या दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या शैलीत वृक्षारोपण केले जाते. अगदी त्याच शैलीत प्रथमच नागपुरात वृक्षारोपणाचा सोहळा म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.कथा, कादंबरी, कविता, नाटक, संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्प अशा नानाविध साहित्य-कलेचे आयाम घेऊन जगताला भुरळ घालणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथमच बंगालमधील शांतिनिकेतन आणि महाराष्ट्रातील नागपूरचे धागे आणखी घट्ट बांधले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी नागपुरात राहणाºया बंगाली नव्हे तर एका मराठी महिलेची प्रगाढ इच्छा कारणीभूत ठरली आणि बंगाली बांधवांनी, ती इच्छा उचलून धरत हा सोहळा आयोजित करण्याचा प्रण घेतला. त्या अनुषंगाने नागपूरकरांना वृक्षारोपणाचा हा अद्भूत सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. रवींद्र संगीताच्या सुरेल स्वरांच्या प्रख्यात गायिका अरुंधती वझलवार-देशमुख यांच्या इच्छेला बंगाली बांधवांनी साथ दिली आहे. इंग्रजी तारखेनुसार ७ ऑगस्ट ही गुरुदेवांची पुण्यतिथी असते. मात्र, बंगाली तिथीनुसार श्रावणातला २२ वा दिवस हा पुण्यतिथीचा दिवस असतो. या तिथीला शांतिनिकेतनतर्फे ‘बाईशे श्राबोण’ असे नामकरण करण्यात आले. यंदा ही तिथी ८ ऑगस्टला येत आहे. त्या अनुषंगाने रविवारचा दिवस बघता बंगाली समाजातर्फे ११ ऑगस्टला दुपारी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

इच्छेला मूर्तरूप येतेय, हीच गुरुदेवांना श्रद्धांजली - अरुंधती देशमुखमाझे वडील प्रा. विद्यासागर वझलवार हे शांतिनिकेतनमध्ये संगीताचे प्राध्यापक असल्याने, मी बालपणापासून ते वयाच्या २३ व्या वर्षीपर्यंत तेथेच होते आणि रवींद्र संगीताचे धडे गिरवीत होते. वैवाहिक कारणाने नागपुरात आल्यानंतर संसारात रमले. काही वर्षांनंतर त्यांनी गुरुदेवांच्या जयंतीला रवींद्र गायनाचे कार्यक्रम सुरू केले. मात्र, शांतिनिकेतनमध्ये ज्याप्रकारे पुण्यतिथी साजरी केली जाते, तशीच नागपुरात आयोजित करण्याची इच्छा होती, असे अरुंधती देशमुख यांनी सांगितले.

पंचमहाभूतांच्या साक्षीने होणार वृक्षारोपण१९२८ मध्ये श्रावणातल्या पहिल्या दिवशी वृक्षारोपणाचा सोहळा साजरा करण्यास टागोर यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये श्रावणातल्या २२ व्या दिवशी अर्थात ७ ऑगस्ट रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पुढच्या वर्षापासून शांतिनिकेतनने गुरुदेवांच्या स्मृतीला अनुसरून श्रावणातल्या पहिल्या दिवसाचा वृक्षारोपणाचा सोहळा २२ व्या दिवशी अर्थात ‘बाईशे श्रावण’ला करण्याचा निर्धार केला. साधारणत: ही तिथी दरवर्षी मागे-पुढे ७, ८ किंवा ९ ऑगस्ट रोजी येत असते. विशेष म्हणजे, वृक्षारोपणाचा हा सोहळा पंचमहाभूतांच्या प्रतिकात्मक रूपांच्या साक्षीने साजरा केला जातो. रवींद्र संगीताची धून, गायन अन् नृत्याच्या तालात ‘बालतरु (रोपटे)’ घेऊन पालखी काढली जाते. अन् पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाशाच्या रूपात सजवलेल्या पाच मुलांच्या साक्षीने वृक्षारोपणाचा सोहळा पार पडतो. अगदी असाच सोहळा नागपुरात साजरा होणार आहे.

टॅग्स :Ravindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर