शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 07:15 IST

Nagpur News २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ५५ हजार स्थानांपासून देशभरात एक लाख ठिकाणी संघाच्या विस्तारावर मंथन करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये अ. भा. प्रतिनिधी सभेत मंथनस्वयंरोजगार, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधनावरदेखील चर्चा होणार

योगेश पांडे

नागपूर : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला गुजरातमधील कर्णावती येथे सुरुवात होणार आहे. मागील काही काळात देशभरात हिजाब, लव्ह-जिहाद आदी मुद्द्यांवर वादंग झाले असताना संघातर्फे प्रतिनिधी सभेत या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ५५ हजार स्थानांपासून देशभरात एक लाख ठिकाणी संघाच्या विस्तारावर मंथन करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्य अहवाल मांडतात. तसेच पुढील उपक्रमांची रूपरेषादेखील निश्चित करण्यात येते. २०२० मध्ये कोरोनामुळे सभा रद्द झाली होती तर मागील वर्षी बंगळुरूत ४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यंदा संघ व संघाशी निगडित ३८ संघटनांतील १ हजार २४८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

तीन वर्षांअगोदरच संघाने शतक महोत्सवी वर्षापर्यंत विस्ताराचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनामुळे नियोजनाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर राबवायच्या सेवाकार्य उपक्रमांची यात चर्चा होणार आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री उपस्थित राहतील.

स्वयंरोजगार, ग्रामविकासाबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता

संघाच्या प्रतिनिधी सभेत दरवर्षी समाजातील विविध विषयांवर प्रस्ताव मांडण्यात येतात. यंदा देशातील ग्रामीण भागातील रोजगारवाढ, स्वयंरोजगार व ग्रामविकासाबाबत प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच समान नागरी कायद्याबाबत ठराव मांडण्यात येतो का, याकडे सामाजिक वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

या विषयांवरदेखील होणार चर्चा

- सामाजिक समरसता

- कुटुंब प्रबोधन

- शिक्षण धोरण

- पर्यावरण संवर्धन

- आर्थिक विकास

- सीमा व अंतर्गत सुरक्षा

- शहरी नक्षलवाद

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ