शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह : लावलेली अर्धीच झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:15 IST

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही : मनुष्यबळ नसल्याने उद्यान विभाग हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षांत १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली. यातील ६३ हजार ३४८ झाडे जिवंत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी तपासणी होण्याची गरज आहे. याची जबाबदारी उद्यान विभागावर आहे. महाराष्ट्र शहरी वृक्षारोपण कायदा १९७५ नुसार उद्यान विभागात सहायक आयुक्तपदाच्या दर्जाचा अधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर कर्मचारी व अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र उद्यान विभागात मंजूर २७३ पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत. यामुळे विभागात कामकाजासाठी कर्मचारी व अधिकारी नाही. अशा परिस्थितीत झाडांचे सर्वेक्षण शक्य नाही.संगोपन कोण करणार?दरवर्षीप्रमाणे पावसाला सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्यात शहरात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहेत. वृक्ष लागवड अभियानाचा पदाधिकारी व अधिकारी गाजावाजा करीत आहेत. मात्र लावलेली झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियान राबविताना विविध सेवाभावी संस्था, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था व नागरिक सहभागी होतात. परंतु अभियान संपल्यानंतर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित केलेली नाही.५० हजार झाडे लागलीच नाहीबांधकाम व अन्य कारणासाठी झाडे तोडण्याची उद्यान विभागाकडे परवानगी घ्यावी लागते. एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी संबंधितांची असते. यासाठी प्रत्येक झाडासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. जाडे जगली तर ही रक्कम परत केली जाते. मागील पाच वर्षात दहा हजार झाडे तोडण्याची परवानी देण्यात आली. त्यानुसार ५० हजार नवीन झाडे शहरात लागणे अपेक्षित होते. परंतु नवीन झाडे लावण्यात आलेली नाही.झोन स्तरावर सक्षम यंत्रणा हवीवृक्ष लागवड अभियानात लावलेली व बांधकामासठी परवानगी घेताना अपेक्षित झाडे लावून ती जगावी. यासाठी महापालिकेच्या झोन स्तरावर सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित होते की नाही. याची तपासणी करण्यासाठी उद्यान विभागाचे स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज आहे तरच लावलेली झाडे जगतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण