शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह : लावलेली अर्धीच झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:15 IST

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही : मनुष्यबळ नसल्याने उद्यान विभाग हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षांत १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली. यातील ६३ हजार ३४८ झाडे जिवंत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी तपासणी होण्याची गरज आहे. याची जबाबदारी उद्यान विभागावर आहे. महाराष्ट्र शहरी वृक्षारोपण कायदा १९७५ नुसार उद्यान विभागात सहायक आयुक्तपदाच्या दर्जाचा अधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर कर्मचारी व अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र उद्यान विभागात मंजूर २७३ पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत. यामुळे विभागात कामकाजासाठी कर्मचारी व अधिकारी नाही. अशा परिस्थितीत झाडांचे सर्वेक्षण शक्य नाही.संगोपन कोण करणार?दरवर्षीप्रमाणे पावसाला सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्यात शहरात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहेत. वृक्ष लागवड अभियानाचा पदाधिकारी व अधिकारी गाजावाजा करीत आहेत. मात्र लावलेली झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियान राबविताना विविध सेवाभावी संस्था, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था व नागरिक सहभागी होतात. परंतु अभियान संपल्यानंतर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित केलेली नाही.५० हजार झाडे लागलीच नाहीबांधकाम व अन्य कारणासाठी झाडे तोडण्याची उद्यान विभागाकडे परवानगी घ्यावी लागते. एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी संबंधितांची असते. यासाठी प्रत्येक झाडासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. जाडे जगली तर ही रक्कम परत केली जाते. मागील पाच वर्षात दहा हजार झाडे तोडण्याची परवानी देण्यात आली. त्यानुसार ५० हजार नवीन झाडे शहरात लागणे अपेक्षित होते. परंतु नवीन झाडे लावण्यात आलेली नाही.झोन स्तरावर सक्षम यंत्रणा हवीवृक्ष लागवड अभियानात लावलेली व बांधकामासठी परवानगी घेताना अपेक्षित झाडे लावून ती जगावी. यासाठी महापालिकेच्या झोन स्तरावर सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित होते की नाही. याची तपासणी करण्यासाठी उद्यान विभागाचे स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज आहे तरच लावलेली झाडे जगतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण