शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह दुर्दैवी; अनुराधा प्रभुदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:37 IST

सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी आहे, असे मत ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या संस्थापिका व अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘मंथन’तर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाचे सैनिक सहिष्णू आहेत. मात्र ते जे वचन देतात ते पाळतातच. आपल्या जीवावर उदार होऊन ते देशाचे रक्षण करतात. मात्र देशात त्यांच्याच शौर्यावरुन राजकारण होते. सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी आहे, असे मत ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या संस्थापिका व अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ‘मंथन’तर्फे रविवारी आयोजित व्याख्यानादरम्यान त्या बोलत होत्या.चिटणवीस केंद्र येथे आयोजित या कार्यक्रमाला एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर हे उपस्थित होते. आपल्या देशात सैनिकांना हवी तशी ओळख मिळालेली नाही. ९९ टक्के चर्चांचे विषय तर क्रिकेट आणि सिनेमाशी निगडित असतात. देशवासीयांना कारगील युद्धाचा पहिला ‘हिरो’ असलेल्या कॅप्टन सौरभ कालिया याचे नावदेखील माहीत नाही.पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परत आलेले फायटर पायलट के.नचिकेता मला म्हणाले होते की देशात आम्हाला कुणी ओळखत नाहीत. त्यांचे हे शब्द कानांमध्ये गरम तेल ओतणारे होते. शूर जवानांची नावे समोर येत नाहीत ही शोकांकिता आहे, असे प्रभुदेसाई म्हणाल्या.सैनिकासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. ते आयुष्य पणाला लावतात. मात्र त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण कधीही सैनिकांचे काम जवळून न पाहिलेले लोक करताना दिसून येतात. देशात लोकशाही आहे व लोक काहीही माहिती नसताना वाट्टेल ते बोलतात. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य उपभोगत असताना नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो. लोकांसाठी स्वातंत्र्य मोफत असते. मात्र त्याची किंमत सैनिक चुकवत असतो. लोक स्वत:च्या स्वार्थासाठी सैनिकांवर टीकाटिप्पणी करतात हे चुकीचे आहे.तरुण पिढीने जागरुक होण्याची गरज आहे. जर तरुणाईने सैनिकांना समजून घेतले व जबाबदाऱ्या पार पाडल्या तर देशातील अनेक समस्या दूर होतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.आपल्या देशातील तरुण बदल घडवून आणू शकतात. त्यांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामात लावावी, असे आवाहन सूर्यकांत चाफेकर यांनी केले. यावेळी अनुराधा प्रभुदेसाई यांनी कारगिल युद्ध, देशाच्या सीमा, तेथील परिस्थिती, जवानांची कामगिरी इत्यादींवर प्रकाश टाकला. अंकिता देशकर यांनी संचालन केले.

टॅग्स :Socialसामाजिक