शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 20:52 IST

कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देगरजूच करताहेत प्रवास : अनेकांची रस्ता मार्गाला पसंती, एअर ट्रॅव्हल्स एजंटचा व्यवसाय ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. शासनाने १४ दिवसाची क्वारंटाईनची अट शिथिल केल्यास विमान प्रवाशांची संख्या वाढेल आणि विमान क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे मत एअर ट्रॅव्हल्स एजंटनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.परतीचे तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवाशाला क्वारंटाईन बंधनकारक नाही उदाहरण देताना एअर ट्रॅव्हल एजंट म्हणाले, नियमानुसार जर मुंबईचा प्रवासी कामानिमित्त विमानाने नागपुरात येत असेल आणि त्याच्याकडे तीन दिवसाच्या आतील परतीचे कन्फर्म तिकीट असेल तर त्याच्या हातावर नागपूर विमानतळावर क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात येणार नाही आणि अशा प्रवाशाला नागपुरात क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण प्रवाशाला नागपूर विमानतळावर प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल आणि त्याच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड असावा. हा प्रवासी मुंबईला परत गेल्यानंतर विमानतळावर त्याच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारण्यात येईल आणि त्याला १४ दिवसांसाठी घरी क्वारंटाईन राहावे लागेल. ही सुविधा कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक नसल्याने अनेकजण विमानाने प्रवास टाळत आहे. याच कारणाने प्रवाशांमध्ये घसरण झाल्याने एअर ट्रॅव्हल एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे.विमाने होतात वेळोवेळी सॅनिटाईज्डपूर्वी नागपुरात ३४ ते ३५ विमाने यायची. कोरोना महामारीमुळे आता सहा विमाने नागपुरात येत आहेत. यातून ४० ते ५० टक्केच प्रवासी प्रवास करीत आहेत. या विमानातून नागपुरात दररोज जवळपास ४०० ते ४५० प्रवासी येतात आणि तेवढेच जातात. त्याचा विमान कंपन्यांनाही फटका बसला आहे. एअर ट्रॅव्हल एजंट म्हणाले, १४ दिवसाची क्वारंटाईनची अट प्रवाशांसाठी मोठी अडचण ठरली आहे. अडचणीविना प्रवास करण्याची त्यांची मागणी आहे. कन्फर्म तिकिटच्या अटीमुळे केवळ व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी नागपुरात एक वा दोन दिवसात काम करून परत जातात. पण सर्वसाधारण प्रवासी नागपुरात येण्यास धजावत नाहीत. विमान कंपन्या शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करीत आहेत. विमाने वेळोवेळी सॅनिटाईज्ड करण्यात येत आहेत. शिवाय प्रवासीही काळजी घेत आहेत. ही सकारात्मक स्थिती असतानाही शासनाची क्वारंटाईनची अट नकोच, असे मत एअर ट्रॅव्हल्स एजंटनी व्यक्त केले.एअर ट्रॅव्हल एजंट आर्थिक अडचणीतआंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत, शिवाय घरगुती विमान प्रवाशांची संख्या कमी झाल्याने अनेक एअर ट्रॅव्हल एजंटचे कार्यालय बंद झाले आहेत. जे सुरू आहेत, त्यांच्याकडे केवळ बोटावर मोजण्याएवढेच प्रवासी येत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्च व भाडे, बँकांच्या कर्जाचे हप्ते आदींचा ताळमेळ साधण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विमान प्रवाशांचे १४ दिवसाचे क्वारंटाईन बंधनकारक त्यामुळे एजंट आर्थिक अडचणीत आहेत. क्वारंटाईन रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने (टीएएआय) सरकारला दिले आहे. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही.शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईननागपूर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहावे लागते. प्रवासी विमानतळावर येताच डॉक्टर्स त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का लावतात. ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या नियमानुसार सुरू आहे. पुढे नियमात बदल झाल्यास त्यानुसार प्रक्रिया राहील.आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.गरजू प्रवासी येताहेत नागपुरातक्वारंटाईनचा नियम आणि मर्यादित विमानांमुळे हवाई प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक एअर ट्रॅव्हल्स एजंटची कार्यालये बंद झाली आहेत. विमान कंपन्यांवर प्रवासी संख्येचे बंधन नाही. क्वारंटाईन संदर्भात प्रवाशांना केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.हरमनदीप सिंग आनंद, व्यवस्थापकीय संचालक, जॅक्सन ट्रॅव्हल्स.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरpassengerप्रवासी