शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

क्वारंटाईन करा, पण साधे पत्र तर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:48 IST

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा विरोध नाही. पण यासंदर्भात संबंधितांना मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्वसूचना व पत्र तर द्यावे, अशी भूमिका सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांनी घेतल्याने मनपाच्या आरोग्य पथकाला दोन दिवस माघारी परतावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा विरोध नाही. पण यासंदर्भात संबंधितांना मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्वसूचना व पत्र तर द्यावे, अशी भूमिका सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांनी घेतल्याने मनपाच्या आरोग्य पथकाला दोन दिवस माघारी परतावे लागले.मोमिनपुरा व सतरंजीपुरा परिसरात सर्वाधित बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील जवळपास अडीच हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात सतरंजीपुरा भागातील १७०० लोकांचा समावेश आहे. यातील निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना सुटी दिल्यानंतर पुन्हा नवीन लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. मात्र क्वारंटाईन केंद्रावर ४० ते ५० लोकांना ४ ते ५ शौचालयांचा वापर करावा लागतो. यात एखादी व्यक्ती बाधित असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका आहे. तसेच जेवणाची सुविधा चांगली नाही, अशा येथून परतलेल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. व्यवस्थेविषयी तक्रारी असल्याने क्वारंटाईन करा, पण आम्हाला मनपा प्रशासनाकडून पत्र द्यावे, अशी भूमिका लोकांनी घेतली.शनिवारी व रविवारी मनपाच्या पथकाने लोकांना क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्राची मागणी केल्याने पथक माघारी परतले. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सवाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.बसचे निर्जंतुकीकरण नाहीक्वारंटाईन करताना लोकांना एकाच बसमधून नेले जाते. यात एखादा बाधित रुग्ण असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका असतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसचे निर्जंतुकीकरण वारंवार करणे आवश्यक आहे. परंतु निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची लोकांची तक्रार आहे.लोकांना अडचणीत टाकण्याचा प्रकारसतरंजीपुरा परिसरातील सर्वाधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. येथील नागरिकांनी यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. असे असताना आता पुन्हा तीन आठवड्यांनंतर रोडच्या पलीकडील आरामशीन व बेकरी लगतच्या परिसरातील लोकांना क्वारंटाईन कशासाठी केले जात आहे. आमचा याला विरोध नाही. परंतु आरोग्य विभागाने तसे पत्र द्यावे. दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये सामूहिक शौचालयाचा वापर करावा लागतो. इतरही व्यवस्था चांगली नसताना घरी सुरक्षित असलेल्या लोकांना अडचणीत टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नगरसेवक नितीन साठवणे यांनी केला आहे.