शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

क्वारंटाईन करा, पण साधे पत्र तर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:48 IST

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा विरोध नाही. पण यासंदर्भात संबंधितांना मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्वसूचना व पत्र तर द्यावे, अशी भूमिका सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांनी घेतल्याने मनपाच्या आरोग्य पथकाला दोन दिवस माघारी परतावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा विरोध नाही. पण यासंदर्भात संबंधितांना मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्वसूचना व पत्र तर द्यावे, अशी भूमिका सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांनी घेतल्याने मनपाच्या आरोग्य पथकाला दोन दिवस माघारी परतावे लागले.मोमिनपुरा व सतरंजीपुरा परिसरात सर्वाधित बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील जवळपास अडीच हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात सतरंजीपुरा भागातील १७०० लोकांचा समावेश आहे. यातील निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना सुटी दिल्यानंतर पुन्हा नवीन लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. मात्र क्वारंटाईन केंद्रावर ४० ते ५० लोकांना ४ ते ५ शौचालयांचा वापर करावा लागतो. यात एखादी व्यक्ती बाधित असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका आहे. तसेच जेवणाची सुविधा चांगली नाही, अशा येथून परतलेल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. व्यवस्थेविषयी तक्रारी असल्याने क्वारंटाईन करा, पण आम्हाला मनपा प्रशासनाकडून पत्र द्यावे, अशी भूमिका लोकांनी घेतली.शनिवारी व रविवारी मनपाच्या पथकाने लोकांना क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्राची मागणी केल्याने पथक माघारी परतले. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सवाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.बसचे निर्जंतुकीकरण नाहीक्वारंटाईन करताना लोकांना एकाच बसमधून नेले जाते. यात एखादा बाधित रुग्ण असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका असतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसचे निर्जंतुकीकरण वारंवार करणे आवश्यक आहे. परंतु निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची लोकांची तक्रार आहे.लोकांना अडचणीत टाकण्याचा प्रकारसतरंजीपुरा परिसरातील सर्वाधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. येथील नागरिकांनी यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. असे असताना आता पुन्हा तीन आठवड्यांनंतर रोडच्या पलीकडील आरामशीन व बेकरी लगतच्या परिसरातील लोकांना क्वारंटाईन कशासाठी केले जात आहे. आमचा याला विरोध नाही. परंतु आरोग्य विभागाने तसे पत्र द्यावे. दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये सामूहिक शौचालयाचा वापर करावा लागतो. इतरही व्यवस्था चांगली नसताना घरी सुरक्षित असलेल्या लोकांना अडचणीत टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नगरसेवक नितीन साठवणे यांनी केला आहे.