शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वकिली व्यवसायात सामाजिक दृष्टिकोन ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:20 IST

प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले.

ठळक मुद्देन्या. मकरंद कर्णिक यांचे आवाहन : एचसीबीए स्टडी सर्कलमध्ये मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत बुधवारी न्या. कर्णिक यांचे ‘निर्णयामध्ये सामाजिक दृष्टिकोन’ विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना करिअरमध्ये दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन केले. कायदा मोडून निर्णय देणे म्हणजे न्याय नव्हे. न्याय करताना नवीन नियमांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून भविष्यातील न्यायदानाचा मार्ग सोपा होतो. न्यायासाठी झगडताना प्रत्येकवेळी जुने निवाडे उपयोगात येतीलच असे नाही. प्रकरणातील तथ्येही अनेकदा न्यायदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे वकिलांनी जुन्या निवाड्याची चिंता करीत बसू नये. बरेचदा छोटे प्रकरणही मनाला समाधान देऊन जाते. कारण, त्या प्रकरणामध्ये शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात असे न्या. कर्णिक यांनी पुढे बोलताना सांगितले. त्यांनी वैयक्तिक जीवनात काही प्रेरणादायक अनुभवही कथन केले.संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. कर्णिक यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक तर, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या सभागृहात पार पडला. अनेक नवोदित वकिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल