शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कोट्यवधींचा ठेवा साध्या कपाटात

By admin | Updated: April 6, 2016 03:19 IST

कोट्यवधींची वाकाटककालीन नाणी गायब झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातील त्रुटी समोर येत आहेत.

नागपूर विद्यापीठ : प्राचीन इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हनागपूर : कोट्यवधींची वाकाटककालीन नाणी गायब झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागातील त्रुटी समोर येत आहेत. या विभागातील संग्रहालयात कोट्यवधींचा ठेवा आहे. संग्रहालयात नाणी तसेच मूर्तींची प्रतिकृती ठेवण्यात आली असून मूळ ठेवा एका साध्या लोखंडी कपाटात बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विभागाकडे लक्ष देण्यासाठी पूर्णवेळ सुरक्षारक्षकदेखील नसल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली २०० हून अधिक नाणी विभागात आता नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. याबाबतचा चौकशी अहवालदेखील गायब झाला असून या प्रकरणातील गूढ वाढले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या विभागाची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’च्या भिंतीला अगदी लागून हा विभाग आहे. या विभागातील संग्रहालयात विविध ठिकाणी उत्खननात सापडलेले प्राचीन अवशेष, मूर्ती तसेच नाणी ठेवण्यात येतात. संग्रहालय अगदी प्रवेशद्वारानंतरच असून येथे देखरेख करण्यासाठी कुणीही व्यक्ती नाही. सुरक्षेची खबरदारी म्हणून येथे ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे विभागप्रमुखांचे फारसे लक्षच नसते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने थेट संग्रहालयात जाऊन तेथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. त्यावेळीदेखील कुणीही तेथे नव्हते. काचेच्या पेटीमध्ये विविध नाणी, प्राचीन शस्त्रे, मूर्ती ठेवलेल्या होत्या. तर बाजूच्या खोलीतील कपाटात मूळ ठेवा होता. अगदी सहजपणे या गोष्टी कोणीही घेऊन जाऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे विभागातील स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या संग्रहालयाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पाणी पिण्याच्या बहाण्याने कुणीही तेथे जाऊ शकतो व तेथून आत शिरकाव करू शकतो. याबाबतीत विभागाकडून आतापर्यंत दक्षता का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)विभागप्रमुखांचा हलगर्जीपणाडॉ. प्रीती त्रिवेदी यांनी २०१३ सालच्या अखेरीस विभागप्रमुखाचे पद स्वीकारले. या विभागात कोट्यवधींचा ठेवा आहे याची त्यांना माहिती असूनदेखील त्यांनी सुरक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे मागणी केली नाही. मुळात या विभागात इतका मौलिक ठेवा आहे याची अधिकाऱ्यांना माहितीच नव्हती. या ठेव्याच्या रक्षणासाठी प्रशासनाला कळविणे हे विभागप्रमुखांचे काम होते. त्यांना यासंदर्भात आता कुठे जाग आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.