शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पुलवामा हल्ला म्हणजे भारताच्या पाठीत केलेला वार : उज्ज्वल निकम यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:40 IST

पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘जस्टा कॉजा’ वार्षिक परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.निकम यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘जस्टा कॉजा’ वार्षिक परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. दहशतवादी हल्ल्यांमुळे देशात नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळताना काळजी घ्यावी लागते. गुन्हा सिद्ध करण्यासाठी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडणे आवश्यक असते. त्यामुळे पुलवामा हल्ला प्रकरणात प्रत्येक पाऊल सावधपूर्वक उचलावे लागणार आहे. तर्कसंगत पुरावे मांडले तरच पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होईल असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी प्रास्तावित केले.महिलांनी अधिकारांसाठी लढावे - वासंती नाईकमुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध’ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांची पूजा करणे भारतीय संस्कृती आहे. असे असताना महिलांवर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार केले जातात. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. त्यामुळे महिलांनी स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी नि:संकोचपणे न्यायालयाचे दार ठोठवावे असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमDr. Babasaheb Ambedkar Collegeडॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यापीठ