शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पायकाचा निधी वापरला बांधकामावर

By admin | Updated: October 27, 2014 00:32 IST

क्रीडा धोरण राबविण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘पायका’ उपक्रम गावागावांत पोहचविला. यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देत गावपातळीपासून मातीतल्या खेळाडूंना नवी उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनाच्या

अभय लांजेवार - उमरेडक्रीडा धोरण राबविण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘पायका’ उपक्रम गावागावांत पोहचविला. यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देत गावपातळीपासून मातीतल्या खेळाडूंना नवी उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु, पायका अंतर्गत मिळालेला निधी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी न वापरता तो भलत्याच कामावर वापरण्यात आल्याने बेसूर ग्रामपंचायतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भिंतीच्या बांधकामावर करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवरही शंकाकुशंका व्यक्त होत आहे. दोन लाख रुपयांच्या या भिंतीच्या बांधकामाचे ‘पोलखोल’ झाल्यास चांगलेच घबाड उघडकीस येणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. ‘पायका’ अंतर्गत एकूण तीन लाख रुपयांचा निधी बेसूर ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला होता. या निधीचा विनियोग क्रीडांगणाची निर्मिती व खेळांच्या साहित्यांची खरेदी यावर करणे अपेक्षित होते. परंतु, खेळाचे मैदान आणि क्रीडा साहित्य यावर थातूरमातूर खर्च करण्यात आला असल्याचे नोंदीवरून दिसून येत आहे. दुसरीकडे, गावातील दवाखान्याच्या भिंतीच्या बांधकामावर २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा अतोनात खर्च करण्यात आल्याची नोंद आहे. सदर बांधकाम एक ते दीड वर्षांपूर्वी करण्यात आले. ही भिंत ५ फूट उंच आणि १२५ फूट रुंदीची आहे. सोबतच ३० किलोच्या आसपास वजनाचे लोखंडी गेटही दवाखान्यात तयार करण्यात आला आहे. एवढ्याशा कामावर अमाप खर्च कसा काय झाला. शिवाय, पायकाचा निधी दवाखान्याच्या बांधकामावर खर्च करता येतो काय, यासह अन्य मूलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. बाळा देशमुख हे बेसूर येथे ग्रामपंचायत सचिवपदावर मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीमध्ये बऱ्यापैकी एकरूप झाले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास चुकीच्या रकमेच्या अनेक नोंदी सापडतील; तसेच मिळालेल्या अनुदानाच्या रकमेतही बरीच तफावत आढळून येईल, असा आरोप रियाज शेख सरदार कन्नोजे, किशोर अवगान, मुरलीधर चावट, कैलास मानमोडे, अंकीत कुबडे, राजू वाढई, स्नेहल भुजबळ, प्रवीण कुबडे आदींनी केला आहे. नागरिकांनाही उद्धटपणाची वागणूक मिळत असून, पंचायत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.