शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पायकाचा निधी वापरला बांधकामावर

By admin | Updated: October 27, 2014 00:32 IST

क्रीडा धोरण राबविण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘पायका’ उपक्रम गावागावांत पोहचविला. यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देत गावपातळीपासून मातीतल्या खेळाडूंना नवी उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनाच्या

अभय लांजेवार - उमरेडक्रीडा धोरण राबविण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘पायका’ उपक्रम गावागावांत पोहचविला. यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देत गावपातळीपासून मातीतल्या खेळाडूंना नवी उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु, पायका अंतर्गत मिळालेला निधी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी न वापरता तो भलत्याच कामावर वापरण्यात आल्याने बेसूर ग्रामपंचायतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भिंतीच्या बांधकामावर करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवरही शंकाकुशंका व्यक्त होत आहे. दोन लाख रुपयांच्या या भिंतीच्या बांधकामाचे ‘पोलखोल’ झाल्यास चांगलेच घबाड उघडकीस येणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. ‘पायका’ अंतर्गत एकूण तीन लाख रुपयांचा निधी बेसूर ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला होता. या निधीचा विनियोग क्रीडांगणाची निर्मिती व खेळांच्या साहित्यांची खरेदी यावर करणे अपेक्षित होते. परंतु, खेळाचे मैदान आणि क्रीडा साहित्य यावर थातूरमातूर खर्च करण्यात आला असल्याचे नोंदीवरून दिसून येत आहे. दुसरीकडे, गावातील दवाखान्याच्या भिंतीच्या बांधकामावर २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा अतोनात खर्च करण्यात आल्याची नोंद आहे. सदर बांधकाम एक ते दीड वर्षांपूर्वी करण्यात आले. ही भिंत ५ फूट उंच आणि १२५ फूट रुंदीची आहे. सोबतच ३० किलोच्या आसपास वजनाचे लोखंडी गेटही दवाखान्यात तयार करण्यात आला आहे. एवढ्याशा कामावर अमाप खर्च कसा काय झाला. शिवाय, पायकाचा निधी दवाखान्याच्या बांधकामावर खर्च करता येतो काय, यासह अन्य मूलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. बाळा देशमुख हे बेसूर येथे ग्रामपंचायत सचिवपदावर मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीमध्ये बऱ्यापैकी एकरूप झाले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास चुकीच्या रकमेच्या अनेक नोंदी सापडतील; तसेच मिळालेल्या अनुदानाच्या रकमेतही बरीच तफावत आढळून येईल, असा आरोप रियाज शेख सरदार कन्नोजे, किशोर अवगान, मुरलीधर चावट, कैलास मानमोडे, अंकीत कुबडे, राजू वाढई, स्नेहल भुजबळ, प्रवीण कुबडे आदींनी केला आहे. नागरिकांनाही उद्धटपणाची वागणूक मिळत असून, पंचायत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.