शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

ही तर प्रसिद्धी याचिका !

By admin | Updated: April 29, 2016 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रावणदहनाला आव्हान देणाऱ्यावर गुरुवारी २५ हजार रुपये ...

रावणदहनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली : दुष्काळ निधीमध्ये २५ हजार जमा करा नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रावणदहनाला आव्हान देणाऱ्यावर गुरुवारी २५ हजार रुपये ‘कॉस्टस्’ (दावा खर्च) बसवला. तसेच, याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचे निरीक्षण नोंदवून संबंधित जनहित याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला २५ हजार रुपये दोन आठवड्यामध्ये मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. ही जनहित याचिका नसून प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे असे मौखिक मत न्यायालयाने निर्णयापूर्वी व्यक्त केले.जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अ‍ॅड. अश्वीन इंगोले यांच्यामार्फत ही याचिका सादर केली होती. विजया दशमीच्या दिवशी देशभर रावणदहनाचे कार्यक्रम होतात. ही प्रथा बंद करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी प्राथमिक सुनावणीनंतर याचिकाकर्त्यावर ताशेरे ओढून वरीलप्रमाणे निर्णय दिला.काय होते याचिकाकर्त्याचे म्हणणेमुंबई पोलीस कायद्यातील कलम १३१, १३४ व १३५ अनुसार कोणत्याही व्यक्तीचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे गुन्हा आहे. कायद्यानुसार, पुतळा जाळण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. असे असताना पोलीस संरक्षणात रावणदहनाचे कार्यक्रम होतात. रावणाचा पुतळा उभारून त्यात फटाके भरले जातात. केरळमधील मंदिरात अलिकडेच फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत मोठी प्राणहानी झाली. रावणदहनाच्या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित असतात. त्यावेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रावणदहन कार्यक्रम कायदेबाह्य ठरवून त्यावर बंदी आणण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.