शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:38 IST

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

ठळक मुद्देविशेष सरकारी वकील म्हणून खटला लढणार

राकेश घानोडे/ लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले जावे, ही समाजाची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने खटला लढवेन. नगराळेला फाशीची शिक्षा मिळवून देणे हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.अ‍ॅड. सत्यनाथन नागपुरातील ख्यातनाम फौजदारी कायदेतज्ज्ञ असून या प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. वर्धा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी गुरुवारी अ‍ॅड. सत्यनाथन यांची याकरिता सहमती घेतली. अ‍ॅड. सत्यनाथन यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले व आपले लक्ष्यही स्पष्ट केले. ही अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटना आहे. या घटनेमुळे समाजमन हादरले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. देशात अशाच घटनांवरून तीव्र असंतोष उफाळला असताना आरोपीने हे क्रूर कृत्य केले. भविष्यात अशा घटनांना आळा बसणे आवश्यक आहे. त्याकरिता नगराळेला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पूर्ण प्रयत्न करणार आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी पीडित प्राध्यापिकेचे बयान, प्रत्यक्षदर्शींचे बयान व परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरतील, असे अ‍ॅड. सत्यनाथन यांनी पुढे बोलताना सांगितले. अ‍ॅड. सत्यनाथन यांचा जन्म नागपुरातील असून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण वर्धा येथे झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९८१ मध्ये एलएल. बी. पदवी उत्तीर्ण केली. तेव्हापासून ते वकिली करीत आहेत.दीर्घ अनुभव असलेले कायदेतज्ज्ञनगराळेला फाशीची शिक्षा होण्यासाठी फौजदारी कायदेतज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करण्याची समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने अ‍ॅड. सत्यनाथन यांचे नाव अंतिम केले आहे. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून फौजदारी खटले लढण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात १९९३ ते १९९६ व २००० ते २००८ या कलावधीत मुख्य जिल्हा सरकारी वकील होते. यापूर्वी त्यांनी माओवादी साईबाबा, संतोष आंबेकर, हरीश्चंद्र धावडे यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध यशस्वीपणे खटले लढले आहेत.

टॅग्स :Capital Punishmentमृत्यूदंडadvocateवकिल