शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

अतिक्रमण हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणला पोलिस संरक्षण पुरवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 5, 2024 19:04 IST

भाजीपाला, फळे, चॅट, पान, चहा आदी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे महामार्गांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

नागपूर: शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आवश्यक त्यावेळी पोलिस संरक्षण पुरवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला. तसेच, महानगरपालिकेनेही त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अतिक्रमण हटवावे, असे सांगितले.

भाजीपाला, फळे, चॅट, पान, चहा आदी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे महामार्गांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दरम्यान, बरेचदा प्राणघातक अपघातही होतात. परिणामी, अतिक्रमनावर नियमित कारवाई करीत राहणे आवश्यक आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. महामार्गांसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी ॲड. अरुण पाटील यांची जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

पारडी उड्डानपुलाचे काम येत्या मार्चपर्यंत संपेलआतापर्यंत पारडी उड्डानपुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चपर्यंत संपेल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उच्च न्यायालयाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. हा पुल कळमना ते एचबी टाऊन, इतवारी ते पारडी, एचबी टाऊन ते मानेवाडा रोड व प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौक असा बांधला जात आहे. पुलाची एकूण लांबी ८.०६ किलोमीटर आहे.

इंदोरा-दिघोरी पुल जून-२०२६ पर्यंतइंदोरा ते दिघोरीपर्यंत उड्डानपुल बांधण्यासाठी जून-२०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हा पुल ८.९ किलोमीटर लांब आहे. पहिल्या टप्प्यात कमाल चौक ते रेशीमबाग चौक तर, दुसऱ्या टप्प्यात भांडे प्लॉट चौक ते दिघोरी चौकापर्यंत पुल बांधला जाईल. पुलाचे कंत्राट एनसीसी कंपनीला देण्यात आले आहे, असेही महामार्ग प्राधिकरणने सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय