शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा द्या

By admin | Updated: December 25, 2015 03:47 IST

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी गरिबांची सेवा हे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात कार्य करून चांगली आरोग्य सेवा प्रदान करावी, ...

देवेंद्र फडणवीस : एन.के.पी साळवे वैद्यकीय संस्थेचा रौप्य महोत्सवनागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी गरिबांची सेवा हे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात कार्य करून चांगली आरोग्य सेवा प्रदान करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एन. के. पी साळवे वैद्यकीय संस्था व संशोधन केंद्र तसेच लता मंगेशकर हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती वेदप्रकाश मिश्रा, संस्थेचे अध्यक्ष रणजित देशमुख, कोषाध्यक्ष आ. आशिष देशमुख, सचिव डॉ. अमोल देशमुख, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. भाऊसाहेब भोगे, गोपाळ दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते एन. के. पी. साळवे यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्याचे कार्य राज्य शासनातर्फे केले जाते. परंतु, या सेवेच्या काही कमतरता भासतात. ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा एक भाग आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य सेवेची उत्तम व्यवस्था सार्वजनिक व भागीदारीतून तयार करायला पाहिजे. यासाठी सर्व जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्नआहे. सैनिकी दवाखान्यांप्रमाणे शासन सांगेल त्या ठिकाणी डॉक्टरांना सात वर्षे सेवा द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, राज्यात मेडिकल, पॅरामेडिकल कॉलेज उघडले जावेत. डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा असा घटक असून, त्यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाची सेवा करावी. वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक तरुणाने ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, रणजित देशमुख यांच्यासह अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झालीत. प्रास्ताविक काजल मित्रा यांनी केले. डॉ. निलोफर मुजावर व डॉ. राखी आंबाडे यांनी संयुक्तरीत्या संचालन केले. (प्रतिनिधी)