शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचे जानेवारीत भूमिपूजन, न्याय मिळतो या विश्वासाने आंदोलने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:48 IST

राज्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत जमीन खरेदीचे ५० टक्के काम पूर्ण होईल, तर डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

नागपूर : राज्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत जमीन खरेदीचे ५० टक्के काम पूर्ण होईल, तर डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. कोरियाकडून पतपुरवठा होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी संपल्या आहेत.राज्यात विविध प्रश्नांवरून आंदोलने केली जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारमध्ये कोडगेपणा होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना आंदोलन करून काही पदरी पडेल, याचा विश्वास वाटत नव्हता. आमचे सरकार संवेदनशील आहे. येथे न्याय मिळतो, असा आंदोलकांना विश्वास आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आंदोलने होत आहेत. अंगणवाडीसेविकांना मागील सरकारने चार हजार मानधनावर ठेवले होते. ते पन्नास टक्क्यांनी वाढविले, तरी आंदोलन सुरूच आहे, असेही ते म्हणाले.>विदर्भाच्या निधीत कट नाहीविदर्भाला शक्य तेवढे देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आता पहिली नियुक्ती किंवा पदोन्नती विदर्भातच होते, असे आमचे धोरण आहे. विदर्भातील रिक्त जागाही भरल्या जात आहेत. विदर्भाच्या निधीत कुठेही कट लावला जात नाही. विकासात विदर्भाला मागे पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.>अपप्रचाराला उत्तर देणारसोशल मीडियावरून भाजपा व सरकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, आता या अपप्रचाराला उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियासाठी विशेष टीम तयार केली आहे. दोन महिन्यांपासून सोशल मीडियात दिसून येणारी नकारात्मकता त्याचाच परिणाम आहे. बनावट अकाउंट तयार करून टिष्ट्वट्स, रिटिष्ट्वट तयार केले जात असल्याचे आढळून आले आहे. रशियासारख्या देशातून अशा पोस्ट टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.>‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील वर्णीबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘राणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातही येतील.’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस