शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आंदोलकांनी सोडले मैदान!

By admin | Updated: December 14, 2014 00:43 IST

हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मागील पाच दिवसांपासून विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे.

पटवर्धन मैदान परिसरात शांतता : कुणी वळले मनोरंजनाकडे, काहींनी केला आरामगणेश खवसे - नागपूरहिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मागील पाच दिवसांपासून विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र शुक्रवारी अधिवेशनाचे कामकाज संपण्यापूर्वीच आंदोलक ‘त्या’ मंडपातून गायब झाल्याचे दिसून आले. दोन दिवस आता कामकाज नसल्याने आणि त्यातच आमदार-मंत्री आपल्याकडे फिरकणार नसल्याची शक्यता असल्याने अनेक आंदोलकांनी ‘मैदान’ सोडले. शनिवारीसुद्धा असेच चित्र होते.सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले. विशेष म्हणजे, १५ वर्षांनंतर स्थापन झालेल्या भाजप - शिवसेना सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी आपल्याला न्याय मिळेल, आपल्या मागण्या सोडविल्या जाईल, अशी खात्री असल्याने अनेक संघटनांनी धरणे आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब केला. पहिल्याच दिवशी १० पेक्षा अधिक संघटनांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये वाढ झाली. या मैदानात धरणे आंदोलनासोबतच साखळी उपोषणही काही संघटनांनी सुरू केलेले आहे. गेल्या पाच दिवसांत तेथे अनेक आमदारांनी भेटी दिल्या. काही संघटनेच्या मागण्यांचे निवेदन पोलिसांमार्फत संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. काहींना चर्चेसाठी बोलविले. मागण्या सोडविण्याचे आश्वासन मिळताच धरणे आंदोलन करणाऱ्या काही संघटनांनी आंदोलनाची सांगता केली. परंतु, अद्याप बऱ्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान होऊ न शकल्याने ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. असे असले तरी शुक्रवारचे कामकाज संपण्यापूर्वी आंदोलकांमध्ये नैराश्याची लाट पसरली. काही आंदोलक मंडपातच आराम करीत बसले होते, काही मनोरंजनात गुंतले तर बरेचसे आंदोलक परिसर सोडून बाहेर फिरण्यास गेले होते. आता पुढे दोन दिवस कामकाज नसल्याने असे चित्र धरणे आंदोलनस्थळी होते. आंदोलक गेले कुठे?धरणे आंदोलन सुरू असताना काही आंदोलकांनी बाहेरची वाट धरली. बहुतांश संघटनेच्या मंडपात असे चित्र शुक्रवारी दिसून आले. केबीसी ठेवीदार संघटनेच्या मंडपातही असेच काहीसे चित्र होते. तेथे काही वृद्ध व्यक्ती आराम करीत बसले होते. त्यांच्या भोवती बॅगाच बॅगा होत्या. याबाबत अधिक माहिती घेतली असता शुक्रवारी या संघटनेचा मोर्चा होता. त्यात सहभागी होण्यासाठी ते सर्व आंदोलक गेले होते. त्या सर्वांच्या बॅगा मात्र मंडपातच होत्या.