शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:20 IST

पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर आणि शैलेश पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रफुल्ल गाडगे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एस.एन. विनोद पुढे म्हणाले, ब्रिटिश शासनाशी लढणारी पत्रकारिता आज आपल्याच सरकारच्या विरोधात लिहायला घाबरत आहे. पत्रकार आणि माध्यम संस्था दबाव असल्यागत व्यक्तिविशेष व दलविशेषाचा महिमामंडन आणि प्रचार प्रसार करण्याचा अजेंडा स्वीकारल्याचे दिसते. एवढा की, सार्वजनिक सभेत माध्यमांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतरही पत्रकार, माध्यम संस्था किंवा पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायाचा आदर्श सोडल्यास प्रतिमा मलीन होईल आणि समाजही विश्वास ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्रकारितेत व्यक्तिगत, सामुदायिक, सामाजिक निर्भयता, निर्भिकता नसेल तर लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. सत्कारमूर्तींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रतिष्ठानचे सचिप दिलीप जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर