शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:20 IST

पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर आणि शैलेश पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रफुल्ल गाडगे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एस.एन. विनोद पुढे म्हणाले, ब्रिटिश शासनाशी लढणारी पत्रकारिता आज आपल्याच सरकारच्या विरोधात लिहायला घाबरत आहे. पत्रकार आणि माध्यम संस्था दबाव असल्यागत व्यक्तिविशेष व दलविशेषाचा महिमामंडन आणि प्रचार प्रसार करण्याचा अजेंडा स्वीकारल्याचे दिसते. एवढा की, सार्वजनिक सभेत माध्यमांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतरही पत्रकार, माध्यम संस्था किंवा पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायाचा आदर्श सोडल्यास प्रतिमा मलीन होईल आणि समाजही विश्वास ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्रकारितेत व्यक्तिगत, सामुदायिक, सामाजिक निर्भयता, निर्भिकता नसेल तर लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. सत्कारमूर्तींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रतिष्ठानचे सचिप दिलीप जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर