शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण; पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:44 IST

मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराज्यभरातील झोपड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा

आॅनलाईन लोकमतनागपूर - मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.आतापर्यंत १ जानेवारी २००० पर्यंतच्याच झोपड्या अधिकृत मानल्या जात होत्या. पंतप्रधान आवास योजनेत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना आहे. मात्र, केवळ २००० पर्यंतच्याच झोपड्यांना संरक्षण असल्याने पुनर्विकासासाठी केवळ ३० टक्केच झोपड्या पात्र ठरत होत्या. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अनेक योजना रखडल्या होत्या. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासंबंधीचे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास विधेयक गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सभागृहात मांडले. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यावर्षीची संबंधित सर्व आकडेवारी अधिकृतपणे उपलब्ध असल्याने त्या वर्षापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. झोपडीधारकास आहे त्याच ठिकाणी किंवा तसे शक्य नसेल तर जवळच्या जागेवर पुनर्विकास योजनेत घर मिळेल. बांधकाम होईपर्यंत त्यांच्या निवासाची व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाईल व ते शक्य नसेल तर भाडे/नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. संक्रमण शिबिरातील गाळ्याचे क्षेत्रफळ किमान १२० चौरस फूट असेल.- २०११ पर्यंतच्या ज्या झोपड्यांचा पुनर्विकास केला जाईल त्यातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिक लाभ दिला जाईल. त्यापेक्षा अधिकचे बांधकाम मूल्य (कन्स्ट्रक्शन कॉस्ट) हे झोपडीधारकांस भरावे लागेल.- २०११ पर्यंतच्या कोणत्या झोपड्या आहेत हे प्रमाणित करण्याचे अधिकार मुंबईत एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असतील. त्यांनी मान्यता दिलेल्या झोपडपट्टयांचाच पुनर्विकास केला जाईल. त्यामुळे कामे गतीने होतील आणि खाबुगिरीला आळा बसेल.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस