शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:45 IST

संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.

ठळक मुद्देलीलाताई चितळे यांचे आवाहनअ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व भारतीय लोक जातीभेद विसरून सामील झाले होते. पण स्वातंत्र्यानंतर मिळालेले एकही आश्वासन, स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आजतर धर्माच्या नावाखाली देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ असलेली राज्यघटनाच छिन्नविछिन्न करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय समारंभात विचारपीठावरून लीलाताई बोलत होत्या. याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विमल थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. लीलाताई यांनी अत्यंत भावनिक स्वरात स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक घडामोडींचा उल्लेख केला. माझे वय ९० वर्षाचे होत आहे. मी वर गेल्यावर आंबेडकर आणि गांधी मला भेटले आणि त्यांनी ‘तुम्ही काय केले’, असे विचारले तर माझी मान शरमेने खाली जाईल, अशी खंत व्यक्त केली. म्हणून संविधान व या देशाची जबाबदारी तुमच्यावर सोपवित असल्याचे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले. समारोपीय समारंभात साहित्यिकांसह आंबेडकरी चळवळीत आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये लीलाताई चितळे यांच्यासह कुमुद पावडे, संमेलनाच्या संयोजिका छाया खोब्रागडे, डॉ. शांता गवई, गीता महाजन, संबुद्ध महिला संघाच्या संस्थापक सदस्या विमल गाडेकर, यामिनी चौधरी, सुलभा कडू, प्रमोदिनी रामटेके, रिता पोटपोसे, शारदा झामरे, माया उके, दिल्लीच्या पुष्पा विवेक, अनिल वासनिक, सतेश्वर मोरे तसेच आंबेडकरी साहित्य महामंळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कविता खोब्रागडे यांनी तर चारुशीला सोमकुवर यांनी आभार मानले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर