शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीच्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सकाची स्वाक्षरीच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग ...

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता १,५२, ४४, ७८३ इतक्या किमतीच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य सेवा संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. नंतर तो धूळखात पडून राहिल्याने अग्निशमन यंत्रणेची खरेदीच झाली नाही.

अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात ही समिती सदर घटनेची कारणमीमांसा करून त्रुटी शोधून काढणार आहे. परंतु रुग्णालय स्थापन होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याला कुणीच गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले. त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. १५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२, ४४, ७८३ इतक्या किंमतीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिम सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले. या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबर रोजी डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहचलाच नाही. यामुळे अग्निशमन यंत्रणेची खरेदीच होऊ शकली नाही. यंत्रणा उपलब्ध असती आणि ‘एसएनसीयू’ कक्षात डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंट उपस्थित असते तर १० बालके आज जिवंत असती, असे बोलले जात आहे.