शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

दीड कोटीच्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सकाची स्वाक्षरीच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग ...

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता १,५२, ४४, ७८३ इतक्या किमतीच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य सेवा संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. नंतर तो धूळखात पडून राहिल्याने अग्निशमन यंत्रणेची खरेदीच झाली नाही.

अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात ही समिती सदर घटनेची कारणमीमांसा करून त्रुटी शोधून काढणार आहे. परंतु रुग्णालय स्थापन होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याला कुणीच गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले. त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. १५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२, ४४, ७८३ इतक्या किंमतीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिम सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले. या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबर रोजी डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहचलाच नाही. यामुळे अग्निशमन यंत्रणेची खरेदीच होऊ शकली नाही. यंत्रणा उपलब्ध असती आणि ‘एसएनसीयू’ कक्षात डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंट उपस्थित असते तर १० बालके आज जिवंत असती, असे बोलले जात आहे.