शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन व्हावे

By admin | Updated: January 15, 2016 03:36 IST

विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद...

श्रीहरी अणे : विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन साजरानागपूर : विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद असल्याचा गैरसमज पसरविण्यात येत आहे. मूळात विदर्भवादी हे मराठी माणसाविरुद्ध नाहीत. मराठीला समृद्ध करण्यात विदर्भाचादेखील वाटा आहे. येथील प्रादेशिक साहित्याला दुय्यम दर्जा देता येणार नाही. विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन आणि वाड्.मय पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कार्याध्यक्ष वामन तेलंग, चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले, शांतारामजी पोटदुखे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. सदानंद देशमुख व सदानंद फुलझेले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मराठी भाषेची मक्तेदारी ही केवळ मुंबई किंवा पुण्यापुरती मर्यादित नाही. असे असताना मराठी भाषेची प्रगल्भता ही केवळ एकाच प्रदेशापुरती मर्यादित आहे असा समज का आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुंबई, पुण्याच्या साहित्यिकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. महाराष्ट्राच्या अगोदरपासून विदर्भात मराठीचा वारसा आहे. मराठी भाषेला विदर्भाने अनेक पैलू दिले. विदर्भातील बोलीला मान येथील नागरिकांनीच द्यायला हवा व तिचा अभिमान बाळगायला हवा, असे अ‍ॅड.अणे म्हणाले. साहित्य आणि कायदा यांचा तसा पाहिला तर संबंध आहे. मराठी भाषेत काळानुरूप अनेक बदल झाले. या भाषेला आणखी वैभवशाली करण्यासाठी स्थानिक भाषाशास्त्राचा यात समावेश करावाच लागेल, अन्यथा भाषा संकुचित होईल. असे प्रतिपादन अणे यांनी केले. कार्यक्रमात ‘निवडक युगवाणी-भाग २’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाश एदलाबादकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शुभदा फडणवीस यांनी संचालन केले तर विलास देशपांडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) विदर्भातील साहित्याला अवकळायावेळी साहित्य संघाच्या वार्षिक वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सदानंद फुलझेले व डॉ.सदानंद देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना वि.सा.संघाच्या कार्याचे कौतुक केले. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी मी पार पाडतो आहे, असे फुलझेले म्हणाले. तर विदर्भातील शेतीप्रमाणेच येथील साहित्याला देखील अवकळा आली आहे, असे धाडसी विधान डॉ. देशमुख यांनी केले.

‘लोकमत’चे राजेश पाणूरकर यांना पुरस्कारयावेळी साहित्यक्षेत्राशी संबंधित सारस्वतांचा व नवलेखकांचा सत्कार वाङ्मय पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे उपसंपादक राजेश पाणूरकर यांचा हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याशिवाय ई.झेड.खोब्रागडे, भाऊ गावंडे, डॉ.राजेंद्र डोळके, उर्मिला निनावे, एकनाथ तट्टे, डॉ. मनोहर नरांजे, बळवंत लामकाणे, मालविका देखणे, केशव मुळे, गणेश भाकरे, ओंकार नंदनवार यांचादेखील विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट शाखा पुरस्काराची मानकरी लाखनी शाखा ठरली.