शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जपानी होरिबा कंपनीचा बुटीबोरी एमआयडीसीत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:01 IST

जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.

ठळक मुद्दे १५ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : २०० कोटी रुपयांची गुंतवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे असतील. होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू, होरिबा इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. राजीव गौतम प्रामुख्याने उपस्थित असतील. हा प्रकल्प २०१९ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. कंपनीचे जगातील अनेक देशांमध्ये उद्योगांचे जाळे असून विविध उत्पादनांमध्ये अग्रेसर आहे.साधारणत: दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे छोटी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी गेले असताना समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जपानी कंपनीचा २०० कोटी रुपये गुंतवणुकीचा मोठा प्रकल्प आता नागपुरात येऊ घातला आहे. उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होरिबा कंपनीने नागपुरात गुंतवणूक केल्यास राज्य शासन संपूर्ण मदत करेल, अशी हमी दिली होती. त्या समारंभात उपस्थित असलेले कंपनीचे संस्थापक आत्सुशी होरिबा, होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू यांनी त्यास काहीच दिवसात प्रतिसाद देत नागपुरात प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला नागपुरात गुंतवणूकीची प्रेरणा मिळावी, अशी भावना डॉ. हाकू यांनी व्यक्त केली.नागपूर प्रकल्पात रक्तातील पेशी तपासण्यासाठीचे सेल काऊंटर मशीनचे उत्पादन तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन होईल. तसेच जागतिक दर्जाच्या सेंट्रल वेअर हाऊसची उभारणी केली जाईल. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक २०० कोटी रुपयांची असेल. हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत कार्यान्वित होईल. दुसऱ्या टप्प्यात अधिक मोठी गुंतवणूक असेल. या प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक हजार जणांना रोजगार मिळेल. होरिबा इंडियाच्या भारतातील कुठल्याही प्रकल्पापेक्षा ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल. जगभर उद्योगांचे जाळे असलेल्या होरिबा लिमिटेडमध्ये सध्या दहा हजार जण कार्यरत आहेत.

टॅग्स :JapanजपानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस