शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

नासुप्रचे अधिकार संपुष्टात आणण्याची प्रक्रि या सुरू

By admin | Updated: September 7, 2016 02:51 IST

नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या अधिकार क्षेत्रातील सात योजना व गुंठेवारी योजनेंतर्गत असलेले

नगरविकास विभागाकडून पत्र : दोन समित्या गठित करणारनागपूर : नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या अधिकार क्षेत्रातील सात योजना व गुंठेवारी योजनेंतर्गत असलेले अभिन्यास महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने शासनस्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.नासुप्रच्या अधिनियमातील तरतुदीनुसार असलेल्या योजनांची सविस्तर व अद्ययावत माहिती, तसेच त्याबाबतची कागदपत्रे, कायद्यातील तरतुदीनुसार अभिप्राय, सदरच्या योजना हस्तांतरणामुळे होणारे परिणाम याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने नासुप्रला दिले आहे. मंगळवारी याबाबतचे पत्र मिळाल्याची माहिती सभापती दीपक म्हैसेकर यांनी दिली. नागपूर शहरात महानगरपालिका व नासुप्र अशा दोन विकास संस्था असल्याने विकासासंदर्भात निर्णय घेताना अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. नासुप्रच्या कामकाजाविषयी नागरिकांत असंतोष आहे. याची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नासुप्रचे शहरातील अधिकार संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने नासुप्रला हे पत्र पाठविले आहे. नासुप्रच्या माध्यमातून शहरात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी ५० हजार घरे, पोलीस हाऊ सिंग योजना, सक्करदरा व फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण, हजरतबाबा ताजुद्दीन दर्ग्याचे सौंदर्यीकरण व विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन फाऊं डेशन सेंटर, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, उद्यान विकास व सौंदर्यीकरण, सांस्कृतिक व व्यापारी संकुल, गृहबांधणी प्रकल्प, अभिन्यासातील विकास कामे, आदींचा यात समावेश आहे. ही जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.(प्रतिनिधी)तांत्रिक समिती तांत्रिक समितीत महानगरपालिकेचे मुख्य अभियंता, नासुप्रचे अधीक्षक अभियंता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा या समितीत समावेश राहणार आहेत. शासनाचा निर्णयनागपूर शहरातील नासुप्रचे अधिकार संपुष्टात आणून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित क रण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक अशा दोन समित्या गठित केल्या जाणार आहेत.