शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच : निवासी आश्रमशाळेतील ३४०० कर्मचारी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 21:23 IST

‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे...’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी राज्यातील १६० केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू पडतात. पगाराविना हे कर्मचारी काम करीत असून उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देपगाराविना कर्मचाऱ्यांवर संकट

गणेश खवसेआॅनलाईन लोकमतनागपूर : ‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे...’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी राज्यातील १६० केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू पडतात. पगाराविना हे कर्मचारी काम करीत असून उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. याकडेच लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनानिमित्त उपोषणाला सुरुवात केली. यावेळी या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’कडे कैफियत मांडली.राज्यात अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, अपंगांच्या निवासी आश्रमशाळेला १०० टक्के अनुदान दिले जाते, तेथील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू आहे. परंतु आमच्या आश्रमशाळांना ना १०० टक्के अनुदान मिळते, ना पगार! असे सांगत या कर्मचाऱ्यांनी पगार होत नसल्यामुळे उद्भवणाऱ्या  समस्या सांगितल्या. शासनाकडून नुसते आश्वासन मिळते. मात्र त्यानंतर कोणत्याच हालचाली केल्या जात नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.महाराष्ट्रात  केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळांची संख्या १६० असून त्यात ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व शाळांमधून सद्यस्थितीत ५० हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. २०१४ पासून या कर्मचाऱ्यांना पगार नाही. पगारच नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनत असून भविष्याची चिंताही त्यांना सतावत आहे. याबाबत सांगताना संघटनेचे अशोक तायडे म्हणाले, २००३ मध्ये अशा आश्रमशाळांना मान्यता देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानंतर तपासणी करून ३२२ आश्रमशाळांना मान्यता देण्यात आली. २००८-०९ मध्ये केंद्रीय आश्रमशाळांच्या अनुदानासाठी दहा लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला. त्यानंतर वैयक्तिक संच मान्यतेबाबातचा शासन निर्णयही घेतला. २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपासणी मोहीम राबविली. दरम्यानच्या काळात आश्वासने, थोड्या हालचाली झाल्या. ७ एप्रिल २०१७ रोजी सामाजिक न्याय मंत्र्यांनीही केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळविले. परंतु त्याचा काहीएक फायदा होऊ शकला नाही. परिणामी आम्हाला उपोषणाचे अस्र उगारावे लागत आहे, असे या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाºयांनी सांगितले.आश्वासनांची खैरातकेंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, शाळांना १०० टक्के अनुदान नाही. त्यामुळे या शाळांतील कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांबाबत कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पत्र, निवेदन, मोर्चा, धरणे - आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मात्र त्यांना आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. आतापर्यंत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री यासह विविध मंत्र्यांनाही निवेदन दिले. आमच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठीच त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये संघटनेचे प्रसाद कुलकर्णी, शैलेश कांबळे, रवी चाटे, नामदेव कोळी, संभाजी इशी, प्रसाद नाकतोडे, दादाभाऊ क्षीरसागर, योगेश राठोड, चिंतामण इशी, नवनाथ तरगळे, अभिजित भारती, सुधीर खेकोडे, नितीन जावरे, दिनेश सोनटक्के, दीपक गरड, दीपक गायवड आदी सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन