शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
2
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
3
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
4
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
5
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
6
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
7
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
8
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
9
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
10
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
11
लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?
12
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
13
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
14
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
16
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
17
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
18
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
19
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
20
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली, काँग्रेसबाबत केले असे विधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 4:40 PM

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीती सरकारमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घाणाघाती टीका करत वादाची ठिणगी उडवली आहे.

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या सहकारी पक्ष काँग्रेसबद्दल वादग्रस्त मत व्यक्त करण्यात आल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. आपल्या मतदारसंघातील एका गावात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अपक्ष आमदार आणि शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल यांनी काँग्रेसवर जबर टीका केली आहे.

हे काँग्रेसवाले मेले होते, यांना कोणी विचारत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांना सरकारमध्ये घेतले आणि हे मेलेले लोक जिवंत झालेत, अशा वादग्रस्त शब्दात जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.  

दोन्ही काँग्रेस पक्षामध्ये गळती लागली होती. यांचे लोक उड्या मारून दुसऱ्या पक्षात जात होते. कोणीही यांना विचारत नव्हते, आज हे मेलेले लोकं जिवंत झाले आहे, असे जयस्वाल म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आपण जे वक्तव्य करत आहोत आपण ओपनली सोशल मिडीयावरुन करत आहे, या संदर्भात कोणाला भीत नाही, एकेकाला आपण पुरून उरणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. 

त्यावरुन महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. आता काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्यावर उत्तर दिलं जातं की जयस्वाल यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं जातं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वाल