शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

खाजगी बसचे भाडे होऊ शकते कमी

By admin | Updated: May 15, 2014 19:45 IST

शी नागपूर : प्रवाशांना भविष्यात लांब पल्ल्याच्या खाजगी बसमध्ये प्रवासभाड्यात मोठ्या प्रमाणात सुट मिळू शकते. केंद्र शासन ऑल इंडिया परमिटच्या टॅक्सला केंद्रीयकृत करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे.

टॅक्समध्ये कपात : आता फक्त केंद्र शासनाचाच करवसीम कुरेशीनागपूर : प्रवाशांना भविष्यात लांब पल्ल्याच्या खाजगी बसमध्ये प्रवासभाड्यात मोठ्या प्रमाणात सुट मिळू शकते. केंद्र शासन ऑल इंडिया परमिटच्या टॅक्सला केंद्रीयकृत करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. हा प्रस्ताव अमलात आल्यास अनेक राज्यात ३ महिन्यांसाठी १ लाख रुपयांपेक्षा अधिक टॅक्स देण्याची गरज भासणार नाही. खाजगी बसचालकांना वर्षाचे फक्त ४० हजार रुपये केंद्रीय परिवहन विभागाला द्यावे लागणार आहेत. यामुळे खाजगी बसेसच्या भाड्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बस संचालकांना वेगवेगळ्या राज्यांचा पथकर द्यावा लागतो. एका प्रस्तावानुसार आता हा टॅक्स फक्त केंद्रीय परिवहन विभागाकडे वर्षभरासाठी एकदाच जमा करावा लागणार आहे. केंद्र शासनाने बसेससाठी ऑल इंडिया परमिटमध्ये टॅक्स ठरविण्यासाठी एक समिती तयार केली आहे. विविध राज्यातील परिवहन कार्यालयांना त्यांच्या राज्यात ऑल इंडिया परमिटसाठी किती टॅक्स आकारण्यात येतो याची माहिती मागितली आहे. याबाबत लवकरच माहिती पाठविण्यात येणार आहे. सूत्रांनुसार रस्ते आणि परिवहन मंत्रालयातर्फे गठित समितीची बैठक झाली आहे. परिवहन विभागाशी संबंधित काही संघटनांनी बैठकीपूर्वी आपल्या सूचनाही परिवहन मंत्रालयाला पाठविल्या आहेत. महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेच्या बससाठी ३.५० लाख रुपये टॅक्स लागतो. अनेक राज्यात तीनपट अधिक टॅक्स भरावा लागतो. आंध्र प्रदेशात १.२५ लाख तर कर्नाटकात १.३० लाख रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्र राज्य बस, ट्रक, टेंपो, टँकर वाहतूक महासंघाचे अध्यक्ष महेंद्र लुले यांनी ट्रकप्रमाणे ऑल इंडिया परमिट असल्यास खाजगी वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या मार्गावर बसेस धावत नाहीत तेथे बसेस वाढविण्यात येऊ शकतात. यामुळे प्रवासभाडेही कमी होणार आहे. राज्यशासनाकडून टॅक्स घेऊनही रस्त्यांची अवस्था चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच परिवहन आयुक्त कार्यालयाने नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ऑल इंडिया परमिट व टॅक्सची माहिती मागितली आहे. आता सध्या मिळत असलेला टॅक्स पुरेसा आहे की नाही हे महाराष्ट्र शासन ठरविणार आहे. हा नियम धोरणाशी निगडित असल्यामुळे शासनच यावर निर्णय घेणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले.