शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही प्राधान्य द्या : आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:19 IST

आदिवासी क्षेत्रासाठी उपलब्ध निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे आदेश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी गुरुवारी येथे राज्यस्तरीय बैठकीत दिले.

ठळक मुद्देमार्चपूर्वी निधी खर्च करण्याचे नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी क्षेत्राच्या विकासासोबत शिक्षण, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करताना आर्थिक व सामाजिक विकासालाही प्राधान्य देण्यात यावे. त्यासोबतच आदिवासी क्षेत्रासाठी उपलब्ध निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे आदेश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी गुरुवारी येथे राज्यस्तरीय बैठकीत दिले.आदिवासी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१९-२० च्या खर्चाचा आढावा तसेच सन २०२०-२१ वर्षासाठीचा जिल्हा वार्षिक आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. आशिष जैयस्वाल, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रकाश गजभिये, आ. धर्मराव बाबा आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, विनोद पाटील, जिल्हाधिकारी दीपक सिंघला, उपसचिव सु.ना. शिंदे, अवर सचिव रवींद्र औटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण उपस्थित होते.आदिवासी विकास योजनेंतर्गत ६० टक्के निधी यापूर्वीच सर्व जिल्ह्यांना प्राप्त झाला असून, उर्वरित ४० टक्के निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्राप्त १०० टक्के निधी आदिवासी विकास कामांवर निर्धारित कालावधीत खर्च करा, असे निर्देश अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी दिले. आदिवासी विकास योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना विशेष सोयीसुविधा पुरविण्यावर भर देतानाच संबंधित जिल्ह्यांनी विकास कामांसाठी अतिरिक्त निधींची मागणी करताना त्याचे पूर्ण नियोजन करावे, जेणेकरून विकास कामांसाठी वाढीव निधी मंजूर करण्यात येईल, असेही आदिवासी विकास मंत्री यांनी यावेळी सांगितले. प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी नागपूर व अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांची माहिती दिली.

नागपूरने केला ६५ टक्के, तर अमरावती विभागाने ६६ टक्के खर्चनागपूर विभागामध्ये जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०१९-२० अंतर्गत मंजूर नियतव्यय ४०५ कोटी ८२ लाख तर विभागास प्राप्त तरतूद ३३५ कोटी ३५ लाख एवढी आहे. जानेवारी २०२० अखेर नागपूर विभागाच्या वतीने १५७ कोटी १३ लाख विभागाच्या विविध कामांवर खर्च करण्यात आले आहे. खर्चाची एकूण सरासरी टक्केवारी ६५ अशी आहे. तसेच, अमरावती विभागामध्ये सन २०१९-२० साठी मंजूर नियतव्यय ३६० कोटी २४ लाख एवढे असून प्राप्त तरतूद ३२१ कोटी ७० लाख एवढी आहे. अमरावती विभागाचा एकूण झालेला खर्च १०६ कोटी ६१ लाख एवढा असून खर्चाची एकूण टक्केवारी ६६ अशी आहे.आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाआदिवासी उपयोजनेंतर्गत दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना सुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या जीवनस्तर उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योजना राबवा, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी यावेळी केल्यात. कृषी व पशुसंवर्धन विभागाने आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी योजनांना प्राधान्य द्यावे. यासाठी वार्षिक योजनेत निधीची तरतूद करावी. प्रत्येक गाव - वाड्यावर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड समस्येबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात. असे निर्देश यावेळी दिलेत. आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी क्षेत्र भेटी उपक्रम राबवून त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देशही आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी दिले.

टॅग्स :K. C. Padaviके. सी. पाडवीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना