शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

प्रधानमंत्री आवास; नागपूर शहरात स्वप्नांचा भ्रमनिरास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 07:33 IST

Nagpur News महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसरे घटकातून आर्थिक दुर्बलांसाठी परवडणारा घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्तावच शासनाकडे मंजुरीसाठी न पाठविल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देमनपाचा प्रस्ताव कागदावरचघोषणा केली पण दुर्बलांना घर मिळालेच नाही

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु घोषणा मोठी असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. परंतु महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसरे घटकातून आर्थिक दुर्बलांसाठी परवडणारा घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्तावच शासनाकडे मंजुरीसाठी न पाठविल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत घरांच्या निर्मितीसाठी चार घटकांचा समावेश आहे. या चार घटकांपैकी घटक क्र.३ व ४ या योजनेची अंमलबजावणी मनपा करीत आहे. घटक ३ अंतर्गत मनपाने खाजगी भागीदारीतून नागपूर शहरात सुमारे २३०० परवडणारे घरकुलांच्या निर्मितीचा संकल्प महापालिकेच्या वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सोडला आहे. परंतु, पूर्वी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दुसरीकडे नासुप्रतर्फे शहरातील वाठोडा, तरोडी, वांजरी येथे ४३४५ घरकुलांची उभारणी करून वाटपही सुरू आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहर विकास मंचचे कार्यकर्ते सतत पाठपुरावा करीत आहेत. मनपाने या प्रकल्पास गती द्यावी व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरे उपलब्ध करावी. अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, रामदास उईके, कोडुलाल नागपुरे, विमल बुलबुले, प्रभा अहेरराव व समन्वयक शैलेंद्र वासनिक यांनी प्रशासनाकडे केली आहे.

१६०० घरकुलाचा प्रस्तावच मंजूर नाही

मनपाच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मार्फत शहरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. घटक क्र.३ मधून सन.२०१८-१९ मध्ये १६०० घरकुलांच्या निर्मितीचे मनपाचे उद्दिष्ट होते. त्या पैकी पहिल्या टप्प्यात वांजरा येथे ३८० तर नारी येथे ३०६ अशा ६८६ बहुमजली सदनिकांच्या निर्मितीचा प्रस्ताव होता. पण, हा पहिला प्रस्तावच अजून मंजूर झालेला नाही.

५.५० लाखात घराचे स्वप्न अपूर्णच

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या या योजनेतून ३० वर्ग मीटर बांधकामाची सदनिका ८ लाखांत उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारचे १.५० लाख व राज्य सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान या ८ लाखांतून वजा करून ५ लाख ५० हजार रुपयामध्ये लाभार्थीस ही सदनिका देण्याचा मनपाचा मूळ प्रस्ताव आहे. परंतु, हा प्रकल्पच प्रस्तावस्तरावर खोळंबला असल्याने दुर्बल घटकांचे महापालिकेतर्फे मिळणाऱ्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे.

महापालिका सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

केंद्र सरकारने देशात कुणीही बेघर राहू नये व सर्व कुटुंबाना परवडणारे घर उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवून २०१५ पासून महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना कार्यांन्वित केली. या योजनेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु, ही योजना घोषित करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या मनपात घरकुल योजना येथे कागदावर असणे हेच मोठे आश्चर्य आहे. या साठी मनपातील सत्ताधारी व प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.

-अनिल वासनिक ( संयोजक, शहर विकास मंच,नागपूर)

 

योजनेत असे आहेत चार घटक

- जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास.

- बँकांमार्फत कर्ज संलग्न व्याज अनुदान योजनेतून घरकुल निर्मिती.

- स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खाजगी भागीदारीतून घरांची निर्मिती.

-वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी लाभार्थींला अडीच लाखांचे अनुदान.

टॅग्स :HomeघरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका