शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रधानमंत्री आवास; नागपूर शहरात स्वप्नांचा भ्रमनिरास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 07:33 IST

Nagpur News महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसरे घटकातून आर्थिक दुर्बलांसाठी परवडणारा घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्तावच शासनाकडे मंजुरीसाठी न पाठविल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देमनपाचा प्रस्ताव कागदावरचघोषणा केली पण दुर्बलांना घर मिळालेच नाही

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत नागपूर शहरात ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु घोषणा मोठी असल्याने नंतर १० हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. परंतु महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसरे घटकातून आर्थिक दुर्बलांसाठी परवडणारा घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्तावच शासनाकडे मंजुरीसाठी न पाठविल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत घरांच्या निर्मितीसाठी चार घटकांचा समावेश आहे. या चार घटकांपैकी घटक क्र.३ व ४ या योजनेची अंमलबजावणी मनपा करीत आहे. घटक ३ अंतर्गत मनपाने खाजगी भागीदारीतून नागपूर शहरात सुमारे २३०० परवडणारे घरकुलांच्या निर्मितीचा संकल्प महापालिकेच्या वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सोडला आहे. परंतु, पूर्वी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दुसरीकडे नासुप्रतर्फे शहरातील वाठोडा, तरोडी, वांजरी येथे ४३४५ घरकुलांची उभारणी करून वाटपही सुरू आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहर विकास मंचचे कार्यकर्ते सतत पाठपुरावा करीत आहेत. मनपाने या प्रकल्पास गती द्यावी व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरे उपलब्ध करावी. अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, रामदास उईके, कोडुलाल नागपुरे, विमल बुलबुले, प्रभा अहेरराव व समन्वयक शैलेंद्र वासनिक यांनी प्रशासनाकडे केली आहे.

१६०० घरकुलाचा प्रस्तावच मंजूर नाही

मनपाच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मार्फत शहरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. घटक क्र.३ मधून सन.२०१८-१९ मध्ये १६०० घरकुलांच्या निर्मितीचे मनपाचे उद्दिष्ट होते. त्या पैकी पहिल्या टप्प्यात वांजरा येथे ३८० तर नारी येथे ३०६ अशा ६८६ बहुमजली सदनिकांच्या निर्मितीचा प्रस्ताव होता. पण, हा पहिला प्रस्तावच अजून मंजूर झालेला नाही.

५.५० लाखात घराचे स्वप्न अपूर्णच

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या या योजनेतून ३० वर्ग मीटर बांधकामाची सदनिका ८ लाखांत उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारचे १.५० लाख व राज्य सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान या ८ लाखांतून वजा करून ५ लाख ५० हजार रुपयामध्ये लाभार्थीस ही सदनिका देण्याचा मनपाचा मूळ प्रस्ताव आहे. परंतु, हा प्रकल्पच प्रस्तावस्तरावर खोळंबला असल्याने दुर्बल घटकांचे महापालिकेतर्फे मिळणाऱ्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे.

महापालिका सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

केंद्र सरकारने देशात कुणीही बेघर राहू नये व सर्व कुटुंबाना परवडणारे घर उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवून २०१५ पासून महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना कार्यांन्वित केली. या योजनेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु, ही योजना घोषित करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या मनपात घरकुल योजना येथे कागदावर असणे हेच मोठे आश्चर्य आहे. या साठी मनपातील सत्ताधारी व प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.

-अनिल वासनिक ( संयोजक, शहर विकास मंच,नागपूर)

 

योजनेत असे आहेत चार घटक

- जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास.

- बँकांमार्फत कर्ज संलग्न व्याज अनुदान योजनेतून घरकुल निर्मिती.

- स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खाजगी भागीदारीतून घरांची निर्मिती.

-वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी लाभार्थींला अडीच लाखांचे अनुदान.

टॅग्स :HomeघरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका