शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पंतप्रधान देणार वंदे भारतला ग्रीन सिग्नल? तपास यंत्रणा अलर्ट मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 21:15 IST

Nagpur News नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे.

ठळक मुद्दे नागपूर - बिलासपूर मार्गावर आठवड्यातून सहा दिवस धावणार

नागपूर : नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे.

१३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी नागपूर - बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेन शनिवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. त्यासंबंधीची योजना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून यापूर्वीच तयार केली आहे. या ट्रेनसाठी दुसऱ्या पाच रेल्वेगाड्यांच्या संचालनाच्या वेळेत आवश्यक ते संशोधन आणि बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदी नागपुरात येत आहेत. ते येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. या पूर्वनियोजित कार्यक्रमासोबतच ते नागपूर स्थानकावरून वंदे भारतला हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त दिल्लीतून दोन दिवसांपूर्वी नागपुरात धडकले. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि अवघ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांनी रेल्वे स्थानक तसेच आजूबाजूचा परिसर पिंजणे सुरू केले आहे. तर, तिकडे पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्यासह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मंगळवारी दुपारी रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्यांनी रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकही पोहोचले

थेट पंतप्रधानच ग्रीन सिग्नल देणार असल्याचा निरोप आल्याने अवघे रेल्वे प्रशासनही तयारीला लागले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी हे आज नागपुरात पोहोचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठकीत या संबंधाने दिशानिर्देश दिले. दरम्यान, या संबंधाने माहिती जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी अधिकृत कार्यक्रम ठरला नसल्याने या संबंधाने काही बोलणे योग्य होणार नसल्याचे म्हटले.

----

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे