शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

सरकारविरोधात प्राथमिक शिक्षक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:20 IST

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देबदली आणि आॅनलाईन कामाविरोधात शिक्षक रस्त्यावर : आम्हाला फक्त शिकवू द्याची दिली हाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला फक्त शिकवू द्या, असा आग्रह शिक्षकांनी प्रशासनाकडे केला.गेल्या सात ते आठ महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच होतात आणि जि.प.चे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या एकाच शासन निर्णयानुसार होतात. परंतु यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या स्वतंत्र शासन निर्णयानुसार आणि आॅनलाईन पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवले. सात आठ महीने उलटूनही बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान या बदली धोरणात काही दुरुस्ती कराव्यात या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. सरकार काहीही ऐकायला तयार नाही.दुसरीकडे मागील चार पाच वर्षापासून शिक्षकांच्या मागे आॅनलाईन कामाचा ससेमिरा सुरू आहे. शाळेत कोणत्याही साधनसुविधा नसताना अनेक अशैक्षणिक स्वरूपाची कामे आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांना करावी लागतात.ही कामे शिक्षकांकडून करणे थांबवावे व ती कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी या मागणीसाठी मागील काही दिवसापासून राज्यभर शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातच वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी बाबत जाचक अटी असलेला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला त्यामुळे शिक्षकांमधील असंतोष अधिकच वाढला.हा असंतोष आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहचला. त्या ठिकाणी झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली.मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केले. यात सुनील पेटकर, सुनील पाटील, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, शरद भांडारकर, शेषराव कांबळे, स्वाती लोन्हारे, मनोज घोडके, सुधाकर मते आदी वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी शासनाने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच संकलित चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.