शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:20 IST

राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरजवाडी, स्टोन, कुंदन राख्यांना मागणी : खरेदीचा उत्साह वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये अन्य सणांइतकेच या पारंपरिक सणाला महत्त्व आहे. काळानुसार या सणाचा ट्रेंड बदलला असला तरी लहान मुलामुलींपासून वृद्ध भावाबहिणींमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह कायम असतो. यावर्षी रविवार, २६ आॅगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा रजवाडी, स्टोन आणि कुंदन राख्यांना चांगली मागणी आहे. फॅन्सी, स्टायलिश राख्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आतापर्यंत ठोक बाजारात ८० टक्के स्टॉक विकण्यात आला आहे. युवती आणि महिलांची आकर्षक व अनोखे रंग, डिझाईन आणि पॅटर्नला जास्त पसंती आहे. शुक्रवारी महिलांनी इतवारी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. राख्यांसोबत ग्रिटिंग कार्डला चांगली मागणी आहे. खरेदी करताना किमतीऐवजी रंगसंगतीला जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.२ ते ५०० रुपयांची राखीबाजारपेठेत धाग्यापासून तयार केलेल्या राखीची किंमत दोन रुपयांपासून आहे. याशिवाय अनोख्या राख्या ५०० रुपयांपर्यंत आणि सराफांच्या दुकानात चांदीच्या राख्या पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेस. दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत आहे. तुळशीचे मणी, रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या बाजारात विक्रीस आहेत. लहान मुलांची कार्टुन राख्यांना पसंती आहे. इतवारीतील विक्रेत्याने सांगितले की, नागपुरातील व्यापारी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता येथून कोट्यवधींच्या राख्या मागवितात. यंदा भाववाढीनंतरही व्यवसायात उत्साह आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने व्यवसाय होण्याचे संकेत आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये या सणाविषयी उत्साह दिसून येत आहे.हॅण्डमेड राख्यांना पसंतीनागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. या राख्यांना सर्वस्तरातून मागणी दिसून येत आहे. गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि बचत गटांतर्फे या राख्या तयार करण्यात येतात. सहा महिन्यांपासून राख्या तयार करण्याला सुरुवात होते. हॅण्डमेड राख्या निर्मितीला वेळ जास्त लागत असल्यामुळे हव्या तेवढ्या राख्यांची निर्मिती होत नाही, असे महिला बचत गटाच्या संचालकांनी सांगितले.रक्षाबंधनात चॉकलेटची दुनियारक्षाबंधन सणात गोड पदार्थांची जागा आता चॉकलेटनी घेतली आहे. खास रक्षाबंधनासाठी बाजारात नामांकित कंपन्यांनी चॉकलेटच्या अनेक व्हेरायटीज दाखल केल्या आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे रक्षाबंधनासाठी तयार केलेले बॉक्सेस मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. हे चॉकलेट लहानांबरोबरच तरुणांमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. पेढे, जिलेबी, रसमलाई, श्रीखंड या पदार्थांपेक्षा रक्षाबंधनासाठी चॉकलेटलाच अधिक पसंती दिली जात असून रक्षाबंधनापूर्वी चॉकलेट खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर