शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:20 IST

राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरजवाडी, स्टोन, कुंदन राख्यांना मागणी : खरेदीचा उत्साह वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये अन्य सणांइतकेच या पारंपरिक सणाला महत्त्व आहे. काळानुसार या सणाचा ट्रेंड बदलला असला तरी लहान मुलामुलींपासून वृद्ध भावाबहिणींमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह कायम असतो. यावर्षी रविवार, २६ आॅगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा रजवाडी, स्टोन आणि कुंदन राख्यांना चांगली मागणी आहे. फॅन्सी, स्टायलिश राख्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आतापर्यंत ठोक बाजारात ८० टक्के स्टॉक विकण्यात आला आहे. युवती आणि महिलांची आकर्षक व अनोखे रंग, डिझाईन आणि पॅटर्नला जास्त पसंती आहे. शुक्रवारी महिलांनी इतवारी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. राख्यांसोबत ग्रिटिंग कार्डला चांगली मागणी आहे. खरेदी करताना किमतीऐवजी रंगसंगतीला जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.२ ते ५०० रुपयांची राखीबाजारपेठेत धाग्यापासून तयार केलेल्या राखीची किंमत दोन रुपयांपासून आहे. याशिवाय अनोख्या राख्या ५०० रुपयांपर्यंत आणि सराफांच्या दुकानात चांदीच्या राख्या पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेस. दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत आहे. तुळशीचे मणी, रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या बाजारात विक्रीस आहेत. लहान मुलांची कार्टुन राख्यांना पसंती आहे. इतवारीतील विक्रेत्याने सांगितले की, नागपुरातील व्यापारी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता येथून कोट्यवधींच्या राख्या मागवितात. यंदा भाववाढीनंतरही व्यवसायात उत्साह आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने व्यवसाय होण्याचे संकेत आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये या सणाविषयी उत्साह दिसून येत आहे.हॅण्डमेड राख्यांना पसंतीनागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. या राख्यांना सर्वस्तरातून मागणी दिसून येत आहे. गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि बचत गटांतर्फे या राख्या तयार करण्यात येतात. सहा महिन्यांपासून राख्या तयार करण्याला सुरुवात होते. हॅण्डमेड राख्या निर्मितीला वेळ जास्त लागत असल्यामुळे हव्या तेवढ्या राख्यांची निर्मिती होत नाही, असे महिला बचत गटाच्या संचालकांनी सांगितले.रक्षाबंधनात चॉकलेटची दुनियारक्षाबंधन सणात गोड पदार्थांची जागा आता चॉकलेटनी घेतली आहे. खास रक्षाबंधनासाठी बाजारात नामांकित कंपन्यांनी चॉकलेटच्या अनेक व्हेरायटीज दाखल केल्या आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे रक्षाबंधनासाठी तयार केलेले बॉक्सेस मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. हे चॉकलेट लहानांबरोबरच तरुणांमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. पेढे, जिलेबी, रसमलाई, श्रीखंड या पदार्थांपेक्षा रक्षाबंधनासाठी चॉकलेटलाच अधिक पसंती दिली जात असून रक्षाबंधनापूर्वी चॉकलेट खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर