शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तूर, मूग, उडीदच्या आयातीवर निर्बंध, डाळींचे भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:02 IST

शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देतुरीचे कमी उत्पादन : भाववाढीचा ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.कोट्यामुळे मिळणार अपुरा साठासरकारने कडधान्याच्या कच्च्या मालावर निर्बंध आणले, पण दाल मिलला कच्चा माल मिळावा म्हणून कोटा पद्धती आणली. सरकार २ लाख टन तूर, १.५० लाख टन उडद आणि १.५ लाख टन मूग आयात करणार आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या एकत्रित मागणीनुसार सरकार प्रत्येकाला ठराविक कच्चा माल देणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे कडधान्याच्या कच्च्या मालाचे भाव वाढले आहे. पण शेतकऱ्यांनाही कच्च्या मालाला चांगला भाव मिळत आहे.कंपन्या खरेदी करताहेत तूरदेशातील मोठ्या कंपन्यांनीही पॅकिंगमध्ये डाळ विक्री सुरू केली आहे. या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून जास्त भावात तूर खरेदी करीत असल्यामुळे स्थानिक दाल मिलला मुबलक तूर मिळणे कठीण झाले असून जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. सरकारने आयातीवर निर्बंध टाकल्यामुळे मोठ्या कंपन्या आयातमुक्त अफ्रिकन देशातून कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात करीत आहे. स्पर्धेत दाल मील चालविणे कठीण झाल्याचे दाल मील संचालक बळवंत अग्रवाल यांनी सांगितले.आयातीचे प्रमाण घटलेकडधान्याच्या कच्च्या मालाची सर्वाधिक आयात म्यानमार येथून होते. एक वर्षापूर्वी भारतात १० लाख टन तूर, ६ ते ७ लाख टन मूग आणि ७ ते ८ लाख टन उडीद, ऑस्ट्रेलियातून १० ते १२ लाख टन चणा आणि कॅनडातून २० ते २२ लाख टन वाटाणा आयात व्हायचा. पण आता निर्बंधानंतर आयात १५ ते २० टक्क्यांवर आली आहे.सरकारकडे तुरीचा साठादोन वर्षांपूर्वी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून सरकारने तुरीची खरेदी केली. ही खरेदी गेल्यावर्षीही सुरू होती. त्यामुळे सरकारकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आयातीवर निर्बंध आणल्यानंतर यावर्षी सरकार तूर दाल मीलला देणार आहे. ही प्रक्रिया लवकर व सुलभ झाली तर तूर डाळीचे भाव आटोक्यात राहतील, असे अग्रवाल यांनी सांगितले.१०० दाल मील बंदनागपुरात पाच वर्षांपूर्वी २०० पेक्षा जास्त दाल मील होत्या. पुरेसा कच्चा माल आणि दोन वर्षांपासून तूर डाळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे १०० पेक्षा जास्त दाल मील बंद पडल्या आहे. शिवाय आयातीला थेट परवानगी नसल्यामुळे कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे. नंतरच्या काळात किती दाल मील सुरू राहतील, हे सांगणे कठीण असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.तूर डाळींचे दर वाढणारगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय सरकारने आयातीवर निर्बंध आणून कोटा पद्धती जारी केली आहे. त्यामुळे दाल मीलला हव्या त्या प्रमाणात तूर मिळणार नाही. आफ्रिकन देशातून तूर, मूग आणि उडदाच्या आयातीला परवानगी दिली आहे. पण या ठिकाणाहून आयात महाग पडते. निश्चित कोट्यामुळे दाल मीलला सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढतील. दाल मीलला क्षमतेच्या तुलनेत कमी तूर मिळाल्यामुळे डाळीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.बळवंत अग्रवाल, अध्यक्ष,विदर्भ दाल मील असोसिएशन.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई