शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

नागपुरात सुपारीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:13 IST

दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा पिकांना फटकाउत्पादन आणि आवक कमी, उलाढाल मंदावली

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे उलाढाल मंदावली आहे.

पांढऱ्या सुपारीचा ९० टक्के उपयोगइतवारी चिल्लर किराणा असोसिएशनचे सचिव आणि सुपारीचे ठोक व्यापारी शिवप्रताप सिंह यांनी सांगितले की, पांढऱ्या सुपारीचे सर्वाधिक उत्पादन केरळ, मंगलोर या राज्यांमध्ये तर गोवा व तामिळनाडू येथे कमी होते. याशिवाय लाल सुपारी आसाम, मिझोरममध्ये होते. लाल सुपारीचा उपयोग फार कमी होतो. यावर्षीही केरळ आणि मंगलोर येथे अनेक दिवस पूर आणि परतीच्या पावसामुळे सुपारी पिकाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे आवक अर्ध्यावर आली. देशात ९० टक्के पांढरी सुपारी विकली जाते. पूजा, पान, गुटखा यात पांढऱ्या सुपारीचा उपयोग होतो.यावर्षी पांढऱ्या सुपारीच्या पिकांना फटका बसल्यामुळे गेल्या दहा दिवसात ठोक आणि चिल्लर बाजारात वाढ झाली आहे. दररोज ४ कोटींचा व्यवसाय १ कोटींवर, जीएसटीचा फटकाव्यवसाय इंदूर स्थलांतरित झाल्यामुळे इतवारी बाजारपेठेतील दररोज ४ कोटींपेक्षा जास्त होणारी सुपारीची उलाढाल आता १ कोटीवर आली आहे. केरळचे इतवारी बाजारात व्यवसाय करणाऱ्या ४० व्यापाऱ्यांपैकी आता २२ ते २३ जण व्यवसाय करीत आहेत. याशिवाय या व्यवसायाला जीएसटीचा फटका बसला आहे. देशात सुपारीवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. दोन वर्षांपूर्वी केरळ आणि मंगलोरची सुपारी नागपुरात यायची आणि येथून संपूर्ण देशात वितरित व्हायची. पण समान जीएसटीमुळे व्यापारी थेट केरळमधून सुपारी मागवितात.

नागपूरची बाजारपेठ इंदूर येथे स्थलांतरितनागपूर ही सुपारीची मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ होती, पण गेल्या दोन वर्षांत सुपारी व्यापाऱ्यांवर शासनाच्या धाडी आणि असामाजिक तत्त्वांच्या अवैध वसुलीच्या त्रासामुळे येथील इतवारीतील ६० घाऊक व्यापाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय इंदूरला स्थलांतरित केला आहे. व्यापारी नागपुरातच बसतात, पण गोदामांमध्ये सीसीटीव्ही बसवून नागपुरातून इंदूरमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दररोज १० ते १२ ट्रकचा (प्रति ट्रक १६ टन) व्यवसाय आता दोन ते तीन ट्रकवर आला आहे.

वार्षिक १० ते १२ हजार कोटींचा व्यवसाय ३ हजार कोटींवरसुपारी नागपुरात विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाले. उदाहरण द्यायचे झाल्यास नागपूर ते कानपूर सुपारी वाहतुकीचे भाडे प्रति किलो ३.५ रुपये आहे तर केरळ ते कानपूर वाहतुकीचे भाव ४ रुपये आहे. त्यामुळेच कानपूर येथील व्यापारी आता थेट केरळमधून सुपारी खरेदी करीत आहेत. सध्या या व्यवसायात गुंतवणुकीच्या तुलनेत नफा कमी झाला आहे. शिवप्रताप सिंह म्हणाले, सन १९९७ मध्ये सुपारीचे भाव दर्जानुसार ५० ते १०० रुपये प्रति किलो होते. हे भाव २००१ पर्यंत स्थिर होते. पण आता ठोकमध्ये २६० रुपये तर किरकोळमध्ये ३६० रुपयांवर गेले आहेत.

डिसेंबरमध्ये भाव कमी होणारडिसेंबरमध्ये नवीन सुपारी बाजारात येणार आहे. आता थोडीफार आवक सुरू झाली आहे. आवक पूर्णपणे सुरू झाल्यानंतर भाव २० ते ३० रुपयांनी कमी होईल, पण किरकोळमध्ये एकदा वाढलेले भाव कमी होण्याची शक्यता नाही. इंडोनिशिया देशातून सुपारीच्या आयातीवर १५० टक्के आयात शुल्क आहे. त्यामुळे काही व्यापारी चोरट्या मार्गाने सुपारीची आयात करायचे. पण धाडसत्रानंतर सुपारी जप्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे चोरट्या मार्गाने सुपारी मागविणे बंद केले आहे. सरकारने सुपारीवरील आयात शुल्क कमी केल्यास देशांतर्गत भाव कमी होतील, असे शिवप्रताप सिंह म्हणाले.

टॅग्स :Marketबाजार