शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नागपूर जिल्ह्यात अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:19 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरात १०३८ तर ग्रामीण भागात १६३६ गुन्हेगारांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीचा संग्राम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गंभीर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिलेले आहेत. नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. शंभरावर छोट्या-मोठ्या टोळ्या असल्याचे सांगितले जाते. या कारवाईसाठी शहर पोलिसांनी आतापर्यंत १,०३८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ६२८ गुन्हेगारांना बेल वॉरंट देण्यात आला आहे. गुन्हेगारांविरुद्धची प्रतिबंधात्मक कारवाई अजूनही सुरूच आहे. यासोबतच शहरात ६२३ लोकांनी शस्त्र जमा केले आहेत.तर ग्रामीण पोलिसांनी १६३६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ६०० गुन्हेगारांना बेल वॉरंट देण्यात आले. ९४ लोकांनी शस्त्र जमा केले आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकArrestअटकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019