शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्करी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:47 IST

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निर्देशपोलीस विभागासोबत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.यासंदर्भात नागपूर व अमरावती विभागाच्या पोलीस महानिरीक्षक व संबंधित विभागातील पोलीस अधीक्षकांची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना अहीर यांनी उपरोक्त माहिती दिली. या आढावा बैठकीदरम्यान गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरीक्षक शेखर, बी.एस.एन.एल. च्या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्या महाव्यवस्थापिका नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलीस उपआयुक्त संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व आर्णीचे आमदार राजू तोडसाम उपस्थित होते.अहीर यांनी सांगितले की, तेलंगणामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच खान्देशमधून होणारी पशुधन तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाला स्थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्या आहेत. आढावा बैठकीमध्ये नागपूर-अमरावती विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नक्षलगस्त भागात मोबाईल टॉवरची क्षमता वाढवागडचिरोली मधील नक्षलग्रस्त भागात मोबाईल नेटवर्कच्या क्षमता वाढीसाठी त्याचे ४ जी तंत्रज्ञानामध्ये अद्ययावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्या क्षेत्रामध्ये टॉवर्स लावण्यासाठी अडचणी येत होत्या त्यादेखील पोलीस यंत्रणेने दूर केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या पोलीस जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहितीही केंद्री गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी दिली.एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनीपाकिस्तानकडून सतत सिसफायरचे उल्लंघन होत आहे. शिवाय आतंकवाद्यांच्या हल्ल्यामुळे काश्मीर धगधगत आहे. यावर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले की, भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर दिले जात असून पाकिस्तानच्या एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनी दिले जात असल्याचे सांगितले. शिवाय चीनवर बोलताना द्विपक्षीय संबंधात सुधारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरministerमंत्री