शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

इचमपल्ली धरणासाठी राज्यपालांवर दबाव!

By admin | Updated: November 12, 2014 00:57 IST

तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना

तेलंगण भाजपा महाराष्ट्राच्या मुळावरअभिनय खोपडे - गडचिरोलीतेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तेलंगण सरकारने या कामासाठी मोठा दबाव वाढविला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत १९८० च्या दशकात इचमपल्ली धरणाचे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता़ या धरणात सिरोंचा तालुक्यातील दीडशे गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहेत. तत्कालीन वनमंत्री छेदीलाल गुप्ता यांनी सदर धरण झाल्यास आपण पहिले आंदोलन करू, असाही इशारा आंध्र प्रदेश सरकारला दिला होता. महाराष्ट्राचा हा विरोध लक्षात घेऊन या धरणाचे काम ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून हे काम थांबविले होते. इचमपल्ली धरणामुळे तेलंगणच्या १० जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये वीज निर्मिती प्रकल्पालाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेलंगण या धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तेलंगण सरकारतर्फे हैदराबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांचा ९ नोव्हेंबर रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राव यांना इचमपल्ली धरणाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले. राज्यपाल राव हे तेलंगणच्या करिमनगर भागातील रहिवासी आहेत. ते भाजपाचे माजी खासदारही होते. ते इचमपल्ली धरणाचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी सत्कारादरम्यान धरणाच्या कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी बंडारू दत्तात्रेय यांचीही वर्णी लागली आहे. तेही या इचमपल्ली धरणाचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय तेलंगण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिष्णा रेड्डी यांनी २००३-०४ मध्ये सदर धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेलंगणमधील भाजपाची भूमिका ही इचमपल्ली धरणाच्या समर्थनाची आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रावर केंद्र सरकार व राज्यपाल राव यांच्या माध्यमातून दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सद्यस्थितीत सुरू असलेल्या चव्हेला धरणाच्या कामालाही विरोध केलेला नाही. आता पुन्हा एका धरणाचे नवे संकट महाराष्ट्रावर येऊ घातले आहे.दरम्यान, चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्राचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १९८० मध्ये आपण आमदार असताना या धरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. सुमारे दीडशेवर गाव बुडीत क्षेत्रात जातील. वनजमीनही बुडणार आहे. त्यामुळे या धरणाला विरोध करण्यात आला होता.