शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

By admin | Updated: September 15, 2015 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना

वसीम कुरैशी ल्ल नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वायूसेनेकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी ५.४२ च्या सुमारास राष्ट्रपतींचे विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानासमोर आठ डुक्कर आले. पण वैमानिकाने आपल्या उत्तम कार्यक्षमतेचा परिचय देत दुर्घटना टाळली. मनपाच्या शतकोत्तर समारंभात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायूसेनेच्या विमानाने सोमवारी नागपुरात दाखल झाले. अतिविशेष व्यक्तीच्या विमानासाठी धावपट्टीवर सक्षम सुरक्षा नसल्याचे पाहून वैमानिक नाराज झाल्याची माहिती आहे. या विमानाच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी वैमानिकावर असते. विमानतळावर डुकरांची हजेरी विमानासाठी धोक्याची घंटा होती.धावपट्टीवर डुक्कर आले कसे? हा एक गंभीर मुद्दा आहे. यापूर्वी लोकमतने धावपट्टीवर प्राण्यांचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली असून काही जागी उंची फारच कमी आहे. याशिवाय आतील भागात दाट झाडे आहेत. यामुळेच काही महिन्यांआधी एकजण भिंत ओलांडून धावपट्टीजवळ आला होता. विमानासाठी डुक्कर धोकादायकया क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे डुक्कर विमानासाठी धोकादायक ठरू शकतात. राष्ट्रपतींच्या हवाई यात्रेसाठी बोर्इंग-७३७ विमानाचा उपयोग करण्यात आला. विमान सुरू असताना जवळील प्राणी टर्बाईन अथवा इंजिन ओढते. त्यामुळे इंजिन नादुरुस्त होऊन आग लागण्याची जास्त शक्यता असते. आजच्या घटनेत डुक्कर विमानाच्या समोरील चाकात आले असते तर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते. ‘एमआयएल’वर होऊ शकते कारवाईवर्ष २००८ पासून विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. धावपट्टीच्या कडेला पक्ष्यांना हटविण्यासाठी जोल गन बसविली आहे. याशिवाय प्राण्यांना धावपट्टीवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी सोलर फेन्सिंग लावली आहे. त्यानंतरही डुक्कर धावपट्टीवर आले. राष्ट्रपतींचा वैमानिक वायूसेनेचा अधिकारी असतो. त्याने केलेली तक्रार हे गंभीर प्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे मिहान इंडियावर कारवाईची दाट शक्यता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे कंपनीला द्यावी लागणार आहेत. खा. दर्डा यांनी वारंवार वेधले लक्ष अशा प्रकारच्या घटना नागपूर विमानतळावर यापूर्वीही घडलेल्या आहेत. खा. विजय दर्डा यांनी संसदेत तसेच संसदेच्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये नागपूर विमानतळावरील सुरक्षाविषयक मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या आगमनाप्रसंगी जर अशी घटना घडत असेल तर सामान्य प्रवाशांच्या बाबतीत विमानतळ प्रशासन किती दक्ष आहे, हे यावरून दिसून येते.