शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

By admin | Updated: September 15, 2015 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना

वसीम कुरैशी ल्ल नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वायूसेनेकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी ५.४२ च्या सुमारास राष्ट्रपतींचे विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानासमोर आठ डुक्कर आले. पण वैमानिकाने आपल्या उत्तम कार्यक्षमतेचा परिचय देत दुर्घटना टाळली. मनपाच्या शतकोत्तर समारंभात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायूसेनेच्या विमानाने सोमवारी नागपुरात दाखल झाले. अतिविशेष व्यक्तीच्या विमानासाठी धावपट्टीवर सक्षम सुरक्षा नसल्याचे पाहून वैमानिक नाराज झाल्याची माहिती आहे. या विमानाच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी वैमानिकावर असते. विमानतळावर डुकरांची हजेरी विमानासाठी धोक्याची घंटा होती.धावपट्टीवर डुक्कर आले कसे? हा एक गंभीर मुद्दा आहे. यापूर्वी लोकमतने धावपट्टीवर प्राण्यांचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली असून काही जागी उंची फारच कमी आहे. याशिवाय आतील भागात दाट झाडे आहेत. यामुळेच काही महिन्यांआधी एकजण भिंत ओलांडून धावपट्टीजवळ आला होता. विमानासाठी डुक्कर धोकादायकया क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे डुक्कर विमानासाठी धोकादायक ठरू शकतात. राष्ट्रपतींच्या हवाई यात्रेसाठी बोर्इंग-७३७ विमानाचा उपयोग करण्यात आला. विमान सुरू असताना जवळील प्राणी टर्बाईन अथवा इंजिन ओढते. त्यामुळे इंजिन नादुरुस्त होऊन आग लागण्याची जास्त शक्यता असते. आजच्या घटनेत डुक्कर विमानाच्या समोरील चाकात आले असते तर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते. ‘एमआयएल’वर होऊ शकते कारवाईवर्ष २००८ पासून विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. धावपट्टीच्या कडेला पक्ष्यांना हटविण्यासाठी जोल गन बसविली आहे. याशिवाय प्राण्यांना धावपट्टीवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी सोलर फेन्सिंग लावली आहे. त्यानंतरही डुक्कर धावपट्टीवर आले. राष्ट्रपतींचा वैमानिक वायूसेनेचा अधिकारी असतो. त्याने केलेली तक्रार हे गंभीर प्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे मिहान इंडियावर कारवाईची दाट शक्यता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे कंपनीला द्यावी लागणार आहेत. खा. दर्डा यांनी वारंवार वेधले लक्ष अशा प्रकारच्या घटना नागपूर विमानतळावर यापूर्वीही घडलेल्या आहेत. खा. विजय दर्डा यांनी संसदेत तसेच संसदेच्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये नागपूर विमानतळावरील सुरक्षाविषयक मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या आगमनाप्रसंगी जर अशी घटना घडत असेल तर सामान्य प्रवाशांच्या बाबतीत विमानतळ प्रशासन किती दक्ष आहे, हे यावरून दिसून येते.