शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळांच्या मुदतवाढीसाठी राष्ट्रपतींचाच आदेश हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आग्रही भूमिका घेतली असतानाच राष्ट्रपतींकडूनच या मंडळांच्या मुदतवाढीचा आदेश निघाला नसल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात काही नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

या मंडळांना पाच वर्षांसाठी शेवटची मुदतवाढ ३० एप्रिल २०१५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विशेष आदेशाद्वारे दिली होती. ती मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपल्यानंतर नवी मुदतवाढ मिळाली नाही आणि मूळ घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२० ला अनुशेष निर्मूलनाबाबत शेवटचे निर्देश जारी केले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस जेव्हा मंडळांची मुदत संपली तेव्हा राज्य व संपूर्ण देश कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा सामना करीत होता. त्यामुळे मुदतवाढीचा प्रश्न फारसा चर्चेत आला नाही.

अनुशेष अजूनही शिल्लकच

दरम्यान, मार्च २०११ मध्ये विदर्भ व मराठवाडा या दोन्ही मागास प्रदेशांमधील आर्थिक अनुशेष संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात सिंचन क्षेत्राचा अनुशेष मुख्य भाग होता. आर्थिक अनुशेष संपला असला तरी भौतिक अनुशेष मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहिला. याचा अर्थ, पैसा खर्च झाला तरी सिंचनक्षमता तयार झाली नाही, हा मुद्दा सोयीस्करपणे दुर्लक्षित करण्यात आला. शेवटच्या आकडेवारीनुसार, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यांमध्ये जून २०१९ अखेरीस १ लाख ६३ हजार १३९ हेक्टरचा सिंचन अनुशेष कायम आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात अशाच पद्धतीने जून २०१९ मध्ये ८०४५ हेक्टरचा अनुशेष आहे.

अनुशेषाचे नव्याने मोजमाप आवश्यक

महत्त्वाचे म्हणजे, १९९४ मध्ये स्व. भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निर्देशांक व अनुशेष समितीने केलेल्या अभ्यासानंतर प्रत्यक्ष जिल्हानिहाय अनुशेषाची मोजणी झालेली नाही. अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या समितीने अनुशेषाचे प्रदेशनिहाय स्तर ठरविले. तथापि, त्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला नाही. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व आधीच्या शिल्लक अनुशेष काढून टाकण्यासाठी प्रादेशिक विकास मंडळांचे अस्तित्व कायम ठेवण्याची गरज आहेच, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

-------------------------------

कोट...

विकास मंडळांना मुदतवाढीचा मुद्दा आता राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात राहिलेला नाही. या मंडळांच्या स्थापनेची तरतूद भारतीय राज्यघटनेत असल्याने राष्ट्रपतींकडूनच त्यांची मुदत वाढविली जाऊ शकते. आता ही मंडळे बंद होऊन एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेल्याने त्यांचे गठन राष्ट्रपतींच्या नव्या अध्यादेशानेच होऊ शकते.

- ॲड. फिरदोस मिर्झा, विधिज्ञ, नागपूर

------------------------------