शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

विकास मंडळांच्या मुदतवाढीसाठी राष्ट्रपतींचाच आदेश हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आग्रही भूमिका घेतली असतानाच राष्ट्रपतींकडूनच या मंडळांच्या मुदतवाढीचा आदेश निघाला नसल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात काही नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

या मंडळांना पाच वर्षांसाठी शेवटची मुदतवाढ ३० एप्रिल २०१५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विशेष आदेशाद्वारे दिली होती. ती मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपल्यानंतर नवी मुदतवाढ मिळाली नाही आणि मूळ घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२० ला अनुशेष निर्मूलनाबाबत शेवटचे निर्देश जारी केले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस जेव्हा मंडळांची मुदत संपली तेव्हा राज्य व संपूर्ण देश कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा सामना करीत होता. त्यामुळे मुदतवाढीचा प्रश्न फारसा चर्चेत आला नाही.

अनुशेष अजूनही शिल्लकच

दरम्यान, मार्च २०११ मध्ये विदर्भ व मराठवाडा या दोन्ही मागास प्रदेशांमधील आर्थिक अनुशेष संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात सिंचन क्षेत्राचा अनुशेष मुख्य भाग होता. आर्थिक अनुशेष संपला असला तरी भौतिक अनुशेष मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहिला. याचा अर्थ, पैसा खर्च झाला तरी सिंचनक्षमता तयार झाली नाही, हा मुद्दा सोयीस्करपणे दुर्लक्षित करण्यात आला. शेवटच्या आकडेवारीनुसार, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यांमध्ये जून २०१९ अखेरीस १ लाख ६३ हजार १३९ हेक्टरचा सिंचन अनुशेष कायम आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात अशाच पद्धतीने जून २०१९ मध्ये ८०४५ हेक्टरचा अनुशेष आहे.

अनुशेषाचे नव्याने मोजमाप आवश्यक

महत्त्वाचे म्हणजे, १९९४ मध्ये स्व. भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निर्देशांक व अनुशेष समितीने केलेल्या अभ्यासानंतर प्रत्यक्ष जिल्हानिहाय अनुशेषाची मोजणी झालेली नाही. अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या समितीने अनुशेषाचे प्रदेशनिहाय स्तर ठरविले. तथापि, त्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला नाही. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व आधीच्या शिल्लक अनुशेष काढून टाकण्यासाठी प्रादेशिक विकास मंडळांचे अस्तित्व कायम ठेवण्याची गरज आहेच, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

-------------------------------

कोट...

विकास मंडळांना मुदतवाढीचा मुद्दा आता राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात राहिलेला नाही. या मंडळांच्या स्थापनेची तरतूद भारतीय राज्यघटनेत असल्याने राष्ट्रपतींकडूनच त्यांची मुदत वाढविली जाऊ शकते. आता ही मंडळे बंद होऊन एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेल्याने त्यांचे गठन राष्ट्रपतींच्या नव्या अध्यादेशानेच होऊ शकते.

- ॲड. फिरदोस मिर्झा, विधिज्ञ, नागपूर

------------------------------