शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राष्ट्रपतिपदी हवी गैरराजकारणी व्यक्ती

By admin | Updated: June 16, 2017 02:05 IST

भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

संघ वर्तुळातून अपेक्षा : उमेदवार सर्वमान्य व कलामांप्रमाणे समर्पित असावायोगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय पक्षांनीदेखील यासंदर्भात आपापले धोरण निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. संघश्रेष्ठींना अंतिम नावाची कल्पना असली तरी संघ वर्तुळात विविध कयास लावले जात आहेत. मात्र राष्ट्रपतिपदी गैरराजकारणी व देशभरात जिच्याकडे आदरयुक्त नजरेने पाहिले जाते, अशी व्यक्तीच विराजमान व्हावी, असा संघ परिवारातून सूर येत आहे.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांची अधिसूचना शनिवारी जारी होणार असून, गरज पडली तर १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपतींच्या नावाला एकमताने मान्यता मिळावी, असे रालोआतर्फे प्रयत्न सुरू आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येत मोट बांधली आहे. राष्ट्रपतिपदी रालोआचे उमेदवार म्हणून अनेक संभावितांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. यात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंह बादल, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उद्योगपती रतन टाटा, इतकेच काय तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचीदेखील चर्चा ‘सोशल मीडिया’वर रंगली आहे. संघ वर्तुळात बहुतांश स्वयंसेवकांची मात्र अपेक्षा वेगळीच आहे. राजकीय व्यक्ती राष्ट्रपतिपदी आली की त्यासोबत विविध वाददेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदावर निष्कलंक, समाजासाठी झटणारा व सर्वमान्य प्रतिमा असणारी व्यक्तीच हवी. रालोआने असा गैरराजकीय उमेदवार दिला पाहिजे. महिला उमेदवार असली तरी विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर राजकीय समीकरणे लक्षात घेता राजकीय उमेदवार द्यावाच लागला तर संबंधित व्यक्ती प्रामाणिक, वादापासून दूर असणारी व समाजात आपल्या कार्याने आदर प्राप्त केलेली हवी, अशी संघाच्या राष्ट्रीय पातळीवर सदस्यांचीदेखील भावना आहे.सर्वांना घेऊन चालणारी व्यक्ती हवी!याअगोदर रालोआच्या कार्यकाळात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले होते. कलाम यांचे कार्य, चारित्र्य आणि व्हिजन हे अतुलनीय होते. त्यामुळेच एरवी हिंदुत्वाची कास धरणाऱ्या संघानेदेखील त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दिली होती. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत संघाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार हे जगजाहीर आहे. राष्ट्रपतिपदाचा रालोआचा उमेदवार कोण असेल हे संबंधित पक्ष ठरवतीलच. संघाचा तो विषय नाही. मात्र या पदावर प्रामाणिक, सर्वमान्य व पात्र व्यक्ती हवी ही अपेक्षा आहे. डॉ.कलाम यांच्या रूपाने देशाला एक ‘व्हिजनरी’ राष्ट्रपती लाभले होते. डॉ.कलाम महानच होते व त्यांच्यासारखीच समर्पित व्यक्ती राष्ट्रपतिपदी विराजमान झाली तर देशाचा गौरव आणखी वाढेल, असे मत संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले. यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.