शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

राष्ट्रपतिपदी हवी गैरराजकारणी व्यक्ती

By admin | Updated: June 16, 2017 02:05 IST

भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

संघ वर्तुळातून अपेक्षा : उमेदवार सर्वमान्य व कलामांप्रमाणे समर्पित असावायोगेश पांडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय पक्षांनीदेखील यासंदर्भात आपापले धोरण निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. संघश्रेष्ठींना अंतिम नावाची कल्पना असली तरी संघ वर्तुळात विविध कयास लावले जात आहेत. मात्र राष्ट्रपतिपदी गैरराजकारणी व देशभरात जिच्याकडे आदरयुक्त नजरेने पाहिले जाते, अशी व्यक्तीच विराजमान व्हावी, असा संघ परिवारातून सूर येत आहे.राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांची अधिसूचना शनिवारी जारी होणार असून, गरज पडली तर १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपतींच्या नावाला एकमताने मान्यता मिळावी, असे रालोआतर्फे प्रयत्न सुरू आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येत मोट बांधली आहे. राष्ट्रपतिपदी रालोआचे उमेदवार म्हणून अनेक संभावितांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. यात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंह बादल, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उद्योगपती रतन टाटा, इतकेच काय तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचीदेखील चर्चा ‘सोशल मीडिया’वर रंगली आहे. संघ वर्तुळात बहुतांश स्वयंसेवकांची मात्र अपेक्षा वेगळीच आहे. राजकीय व्यक्ती राष्ट्रपतिपदी आली की त्यासोबत विविध वाददेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदावर निष्कलंक, समाजासाठी झटणारा व सर्वमान्य प्रतिमा असणारी व्यक्तीच हवी. रालोआने असा गैरराजकीय उमेदवार दिला पाहिजे. महिला उमेदवार असली तरी विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर राजकीय समीकरणे लक्षात घेता राजकीय उमेदवार द्यावाच लागला तर संबंधित व्यक्ती प्रामाणिक, वादापासून दूर असणारी व समाजात आपल्या कार्याने आदर प्राप्त केलेली हवी, अशी संघाच्या राष्ट्रीय पातळीवर सदस्यांचीदेखील भावना आहे.सर्वांना घेऊन चालणारी व्यक्ती हवी!याअगोदर रालोआच्या कार्यकाळात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले होते. कलाम यांचे कार्य, चारित्र्य आणि व्हिजन हे अतुलनीय होते. त्यामुळेच एरवी हिंदुत्वाची कास धरणाऱ्या संघानेदेखील त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दिली होती. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत संघाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार हे जगजाहीर आहे. राष्ट्रपतिपदाचा रालोआचा उमेदवार कोण असेल हे संबंधित पक्ष ठरवतीलच. संघाचा तो विषय नाही. मात्र या पदावर प्रामाणिक, सर्वमान्य व पात्र व्यक्ती हवी ही अपेक्षा आहे. डॉ.कलाम यांच्या रूपाने देशाला एक ‘व्हिजनरी’ राष्ट्रपती लाभले होते. डॉ.कलाम महानच होते व त्यांच्यासारखीच समर्पित व्यक्ती राष्ट्रपतिपदी विराजमान झाली तर देशाचा गौरव आणखी वाढेल, असे मत संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले. यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.