शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Accident: पालखी महामार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक; पती- पत्नीसह चार ठार
2
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
3
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
4
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
5
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
6
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
7
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
8
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
9
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
10
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
11
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
12
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
13
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
14
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
15
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
16
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
17
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
18
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
19
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
20
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी

अध्यक्षांसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच

By admin | Updated: August 22, 2014 01:32 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी

पडद्याआड हालचाली : राष्ट्रवादीकडून जुन्या समीकरणाची चाचपणी?नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.सर्वच पक्षात या पदासाठी इच्छुकांची भरमार असली तरी, जि.प.तील संख्याबळ विचारात घेता स्वबळावर कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष शक्य नाही. सर्वाधिक २२ सदस्यसंख्या असलेल्या भाजप व १९ सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. २० सप्टेंबरला निवडणूक असल्याने भाजप-शिवसेनेच्या बहुसंख्य सदस्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पडत आहे. वेळप्रसंगी बंडाची तयारी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तूर्त कुणाच्याही नावाची शिफास न करता विधानसभा निवडणुकीत मदत होईल. अशाच सदस्यांची शिफारस भााजप आमदार करणार आहेत.भाजपच्या शुभांगी गायधने, कल्पना चहांदे, निशा सावरकर, शकुंतला हटवार व अरुणा मानकर आदी अध्यपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेच्या भारती गोडबोले व वर्षा धोपटे यांचीही नावेही चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या वादातून निशा सावरकर व भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. काँग्रेसचे संख्याबळ १९ आहे. बहुमतासाठी त्यांना ११ सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीचे सात, बसपा, आरपीआय व शिवसेना बंडखोर असे तीन सदस्य काँगे्रेससोबत येण्याची शक्यता गृहित धरली तरी आघाडीचे संख्याबळ २९ पर्र्यंतच जाते. त्यामुळे गोगपा वा शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला हाताशी धरून जि.प.ची सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु राष्ट्रवादीने अद्याप पत्ते ओपन केलेले नाही. दुसरीकडे युतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची सदस्य संख्या आठ असूनही या पक्षाच्या वाट्याला उपेक्षाच आली. राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व शिक्षण सभापती अशी महत्त्वाची पदे तर शिवसेनेच्या वाट्याला महिला बालकल्याण व कृषी अशी खाती देण्यात आली. जि.प.च्या ५९ सदस्यांत भाजप- शिवसेनेचे ३० संख्याबळ आहे. पण सेनेच्या पुष्पा देशभ्रतार काँग्रेससोबत असल्याने युतीची सत्ता अडचणीत आली आहे. याही परिस्थितीत गोगपासोबत राहिल्यास सत्ता समीकरण जुळते. परंतु शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला अध्यक्षपद द्यावे लागेल. अशावेळी भाजप सदस्य बंडखोरी करण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी दगाफटका होण्याची शक्यता असल्याने सत्ता टिकविण्यासाठी युतीच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय पर्याय नसल्याने सध्याचेच समीकरण कायम ठेवण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. (प्रतिनिधी)